Aamir Khan on Love Jihad : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या अभिनयासोबतच स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखला जातो. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या निमित्तानं आमिरनं नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. 2014 मध्ये आमिर खानचा 'पीके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्याला घेऊन तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानं हा चित्रपट का केला यावरून देखील त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आमिर खाननं या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केल्याचं म्हटलं जातं होतं. आता आमिर खाननं या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे.
रजत शर्मा यांच्या आपकी अदालय या कार्यक्रमात आमिर खाननं हजेरी लावली होती. आमिरला सांगितलं की 'ट्रोल्स बोलतात की तू लव्ह जिहाद करतो.' ते म्हणतायत की 'पीकेमध्ये तू हिंदू मुलीचं एका पाकिस्तानी मुस्लिमसोबत असलेल्या नातं पाहता त्यांना लग्न करण्याचा सल्ला देत ते योग्य आहे असं म्हटलं होतं. त्यावर आमिर उत्तर देत म्हणाला, 'जेव्हा कोणत्याही दोन धर्माचे लोकं एकत्र येतात. त्यांच्या मनात प्रेम असतं. त्यांना लग्न करायचं असतं. प्रत्येकवेळी लव्ह जिहाद नसतं.'
आमिर खान त्याचं म्हणणं काय आहे ते सांगत म्हणाला, 'दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं मन कधी एकत्र येतं, तर ही माणुसकीची गोष्ट आहे. प्रत्येकवेळी लव जिहाद होत नाही. जेव्हा दोन लोकं आणि त्यांचं मन हे एकत्र येतात तेव्हा ही माणूसकीची गोष्ट असते. हे धर्माच्या पलिकडे जातं.'
हेही वाचा : अनुष्का शर्माच्या 'बहिणी'कडे चाहते मागतायत विराटचा फोन नंबर; इन्स्टाग्राम ट्रेंडमुळे VIRAL
आमिर खाननं पुढे सांगितलं 'मला तुम्हाला सांगायचं आहे की माझी बहीण निखत तिचं लग्न संतोष हेगडेसोबत झालं, तो हिंदू आहे तर त्याला तुम्ही लव्ह जिहाद बोलणार? माझी छोटी बहीण फरत तिचं लग्न राजीव दत्तासोबत झालं ती हिंदू आहे. माझी बहीण मुस्लिम आहे. तर त्याला तुम्ही लव्ह जिहाद बोलणार करणार का? माझी लेक इरा तिचं आता काही काळापूर्वी लग्न झालं तिनं नुपूरसोबत लग्न केलं. या जगात प्रेम हे सगळ्यात मोठं आहे.'