Aamir Khan Dangal : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं अनेक देशांमध्ये बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. पण हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात आला नाही. आता त्या मागचं कारण स्वत: आमिर खाननं सांगितलं आहे. आमिर खाननं एका मुलाखतीत सांगितलं की पाकिस्तानी सेंसर बोर्डानं त्याच्याकडे खूप मोठी मागणी केली होती. त्यामुळेच हा चित्रपट पाकिस्तानमध्य प्रदर्शित होऊ शकला नव्हता.
छोट्या पडद्यावरील आपकी अदालत या कार्यक्रमात आमिर खाननं हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं त्याच्या पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झालेल्या दंगल या चित्रपटातील एका सीनमधील राष्ट्रगीत आणि तिरंगा काढण्यास सांगितलं होतं. आमिर याविषयी बोलताना म्हणाला, 'जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या एका निर्मात्यांपैकी एक डिन्जी होतं. त्यांनी हा प्रेझेंट केला. पाकिस्तानच्या सेंसर बोर्डानं त्यांच्याकडे गीता फोगाटच्या मॅन जिंकणारा सीन आणि भारतीय झेंडा आणि भारतीय राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितलं.'
"I refused to release Dangal in Pakistan bcoz they decided not to show our national flag and national anthem, people told me you will lose lot of collections, then I said I don't care about collections from Pak":- Megastar #AamirKhan pic.twitter.com/wcN9mr3z4Q
— RAJ (@AamirsDevotee) June 13, 2025
पुढे आमिर काय झालं याविषयी बोलताना म्हणाला, 'त्यांनी सांगितलं की जो पर्यंत असं होतं नाही तोपर्यंत ते चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत. एका सेकंदात, मी त्यांना म्हणालो की पाकिस्तानमध्ये आपला चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मला त्याविषयी विचारही करायचा नाही. त्यांनी सांगितलं की यामुळे आपल्या बिझनेसवर परिणाम होऊ शकतो. मी म्हणालो, जर कोणी मला माझा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत काढण्यास सांगत असेल तर मला त्यात काही रस नाही. मला असं करायचं नाही.'
हेही वाचा : हेमा मालिनी नाही 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते धर्मेंद्र; फक्त तिला पाहण्यासाठी करायचे मैलोनमैल प्रवास
आमिर खानचा दंगल हा चित्रपट महावीर फोगाट यांच्या कुस्तीपटू मुली गीता फोगाट आणि बबीता फोगाट यांच्यावर आधारीत आहे. आमिर खाननं महावीर फोगाट यांची भूमिका साकारली आहे. तर दंगल हा चित्रपट त्या वर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आमिरच्या या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं सगळीकडून कौतूक करण्यात आलं. तर हा चित्रपट आजही अनेकदा प्रेक्षक पाहताना दिसतात. त्यामुळे एक वेगळी ऊर्जा संचारते असं अनेकांचं म्हणणं आहे. तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक पालकांनी त्यांच्या मुलांच्या कुस्तीमध्ये जाण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.