Marathi News> मनोरंजन
Advertisement

काजोलचा देवावरून उडाला विश्वास! म्हणाली, 'आठवड्याभरात जे झालं त्यानंतर...'

Kajol : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या गोष्टीविषयी सांगितलं आहे. 

काजोलचा देवावरून उडाला विश्वास! म्हणाली, 'आठवड्याभरात जे झालं त्यानंतर...'

Actress Kajol Shocking Revelation: बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सध्या तिचा आगामी चित्रपट 'मा' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान, काजोलनं तिच्या आयुष्यात असलेल्या अशा एका टप्प्याविषयी सांगितलं जेव्हा तिचा देवावर असलेल्या विश्वास हा संपला होता. थोडक्यात तिचा देवावर विश्वास नव्हता. एक आठवडा तिच्यासाठी खूप तणावपूर्ण होता याविषयी सांगितलं. पण तिनं कसं तरी स्वत: ला सांभाळलं आणि विचार केला की यूनिव्हर्सची इच्छा दुसरी काही असेल आणि तिच्या नशिबात दुसरं काही लिहिलं असेल. त्यामुळे हे सगळं झालं. 

काजोलनं ही मुलाखत 'बॉलिवूड बबल'ला दिली. या मुलाखतीत जेव्हा तिला विचारण्यात आलं की तिनं कधी ईश्वराच्या अस्तित्वावर किंवा तो ज्या प्रमाणे सगळ्या गोष्टी घडवूण आणतो यावर प्रश्न उपस्थित केले आहेत का? तर कोणत्या गोष्टीचा विचार न करता स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या काजोलनं मान्य केलं की 'हो, नक्कीच. एक वेळ अशी होती जेव्हा मी ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत होते. माझ्या सगळ्या प्रार्थना, श्रद्धा, त्या सगळ्या काही कामाच्या नाही असं वाटू लागलं होतं.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

दुःख आणि मानसिक तणावामुळे उडाला देवावरचा विश्वास

काजोल पुढे म्हणाली की 'हा काळ जवळपास एक आठवडा चालला. त्या काळात तिच्या मनात खूप प्रश्न होते, खूप दुःख आणि मानसिक तणाव होता.' ती म्हणाली, 'तो काळ खूपच कठीण होता. मी खरोखरच संघर्ष करत होते. पण मग मी स्वतःला सावरलं. वाटलं, कदाचित यामागे काही कारण असेल. कदाचित हे माझ्या नशिबात नव्हतं. कदाचित युनिव्हर्सच्या मनात काही वेगळंच असेल.'

हेही वाचा : ...जेव्हा घटस्फोटानंतरही विवेक लागू आणि रीमा यांनी साकारली नवरा-बायकोची भूमिका!

काजोलचा ‘मा’ हा चित्रपट 27 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलं असून, अजय देवगन, ज्योती देशपांडे आणि कुमार मंगत पाठक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक मायथोलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. तर हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

रामोजी फिल्म सिटीबाबतच्या वक्तव्यावरून वाद

काजोलनं अलीकडे दिलेल्या एका वक्तव्यामुळे वाद सुरु झाला आहे. तिनं म्हटलं की, 'रामोजी फिल्म सिटी ही पछाडलेली आहे.' या विधानावरून हैदराबादमधील लोक नाराज झाले आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की 'काजोल हे सगळं चर्चेत येण्यासाठी बोलत आहे आणि हा एक गैरजबाबदारपणा आहे.'

Read More