Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अमिताभने रेखाशी लग्न करायला हवं होतं, ती त्याला...'; दिग्दर्शकानं सांगितली 'मन की बात'

Amitabh Bachchan- Rekha : अमिताभ आणि रेखा यांच्यातील नात्याल पाहता दिग्दर्शकानं त्या दोघांनी लग्न करायला हवं होतं असं म्हटलं होतं. 

'अमिताभने रेखाशी लग्न करायला हवं होतं, ती त्याला...'; दिग्दर्शकानं सांगितली 'मन की बात'

Amitabh Bachchan- Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा 'उमराव जान' हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुजफ्फर अली यांनी केलं होतं. तर चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असताना त्यांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यानिमित्तानं बोलत असताना रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याविषयी ते काय म्हणाले हे जाणून घेऊया. 

'उमराव जान' हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि हे तेच वर्ष आहे जेव्हा अमिताभ, रेखा आणि जया बच्चन यांचा 'सिलसिला' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळी उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर असलेल्या 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' त लिहिलं आहे की मुजफ्फर यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याविषयी काय सांगितलं. 

मुजफ्फर यांनी अमिताभ आणि रेखा यांच्याविषयी व्यक्त केली 'ही' इच्छा

पुस्तकात इस्मान यांनी लिहिलं की मुजफ्फर यांनी यावर यांना सांगितलं की "रेखा या खूप सेन्सेटिव्ह महिला आहेत. 'उमराव जान'चं दिल्लीमध्ये शूटिंग सुरु होतं आणि त्या दरम्यान, अमिताभ बच्चन हे आमच्या सेटवर येऊन बसले होते. हे सत्य आहे. जेव्हापण त्या अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करायच्या, तेव्हा बोलता रेखा या त्यांना, त्यांनी या शब्दांचा वापर करायच्या, जसं त्या स्वत: ला विवाहीत असल्याचं मानायच्या. मला वाटतं की त्या स्वत: ला विवाहीत असल्याचं समजायच्या."

अमिताभ यांनी रेखा यांनी द्यायला हवी होती ओळख

लेखानं पुढे लिहिलं की चित्रपटसृष्टीत रेखा आणि अमिताभ यांचे अनेक मित्र होते, पण मुजफ्फर अली ही तितके  हुशार आणि राजकारणी नव्हते. ते थेट आणि स्पष्ट बोलणारे होते. त्यांनी एकदा म्हटलं होतं, ‘ती त्याच्यावर प्रेम करत होती. अमिताभ यांनी त्यांना एक ओळख द्यायला हवी होती. त्याने रेखाशी लग्न करायला हवं होतं.’

'सिलसिला' सोबत दिग्दर्शक यश चोप्रा यांनी देखील त्यांच्या चित्रपटासाठी या तिघांना एकत्र कास्ट केलं होतं आणि म्हटलं की "मी कायम अस्वस्थ रहायचो आणि घाबरलेला असायचो कारण हे रील लाइफमध्ये येणारं होतं. जया त्यांची पत्नी आहे आणि रेखा त्यांची गर्लफ्रेंड आहे, हीच गोष्ट होती. काहीही होऊ शकत होतं कारण ते एकत्र काम करत होते." 'सिलसिला' नंतर अमिताभ बच्चन आणि रेखी यांनी पुन्हा स्क्रीन शेअर केली नाही.

Read More