Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानची हजेरी अन् पहिल्याच एपिसोडनंतर कपिलच्या शोवर प्रेक्षकांची नाराजी; डबल मीनिंग जोक्सचा आरोप

Kapil Sharma Show Salman Khan : कपिल शर्मा शोचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा नेटफ्लिक्सवर पुन्हा एकदा सुरु झाला असून त्याचा हा 3 सीझन आहे. याचा पहिला सीझन प्रदर्शित झाला असून त्यावरून हा वाद सुरु झाला आहे. 

सलमानची हजेरी अन् पहिल्याच एपिसोडनंतर कपिलच्या शोवर प्रेक्षकांची नाराजी; डबल मीनिंग जोक्सचा आरोप

Kapil Sharma Show Salman Khan : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या शोचा पहिला एपिसोड नुकताच प्रसारित झाला. त्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. त्यानं शोमध्ये काही मजेदार गोष्टी शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र, एपिसोडनंतर सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकांचं म्हणणं आहे की शोमध्ये विनोदाऐवजी डबल मीनिंग जोक्स जास्त वापरले जात आहेत. काही प्रेक्षकांनी कपिल शर्मा आणि त्यांच्या टीमवर वाईट आणि बिनधास्त कॉमेडीचा आरोप केला आहे. विशेषत: त्याचं स्क्रिप्ट या परत-परत वापरल्या जातात, असंही अनेकांचं मत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

त्याशिवाय, कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यावर देखील टीका झाली आहे. शोमध्ये तो महिलांच्या कॉस्ट्युममध्ये दिसतात आणि सलमान खानला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दाखवले आहे. हे दृश्य अनेकांना खटकले असून, सोशल मीडियावर काहींनी ते असभ्य आणि लाजीरवाणं असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : 'ट्रॅजडी क्वीन' मीना कुमारी यांची भूमिका साकारणार 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, ठरू शकतो कमबॅक सिनेमा

थोडत्याच, शोच्या पहिल्याच एपिसोडनंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत शोच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जरी कपिल शर्मा आणि त्याची टीम पूर्वीपासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली असली, तरी या नव्या सीझनमध्ये कॉमेडीच्या नावाखाली सुरू असलेल्या भडकपणावर संताप व्यक्त होत आहे. शोवर अश्लील विनोद केल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खाननं हजेरी लावली. यावेळी सलमान खान वेगवेगळ्या गोष्टींवर बोलताना दिसला. त्यानं कधी आमिर खान आणि त्याच्या लग्नाविषयी बोलताना. तो पुन्हा पुन्हा का लग्न करतो यावर त्याचं मत सांगत विनोद केला. तो इथे थांबला नाही तर त्यानं त्याचा धाकटा भाऊ सोहेल खानची पत्नी सीमा सचदेहवर असं वक्तव्य केलं ज्यानं सगळ्यांच्या नजरा वळल्या. तिच्यासाठी तो घर सोडून पळून गेला आणि आता तिचं पळून गेली. त्यावर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेक लोकं कपिल शर्माच्या शोला तर काही लोकं सलमान खानला ट्रोल करत आहेत. 

Read More