Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC 16: आता ऐकू शकणार नाही 'देवियों और सज्जनों...'; भावूक होत अमिताभ बच्चन म्हणाले, 'आता पुढच्या...'

Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडच्या शेवटी 'हे' काय बोलून गेले अमिताभ बच्चन...

KBC 16: आता ऐकू शकणार नाही 'देवियों और सज्जनों...'; भावूक होत अमिताभ बच्चन म्हणाले, 'आता पुढच्या...'

Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपती' हा शोचं नाव घेतलं की सगळ्यात आधी काही डोळ्यासमोर येत असेल तर दुसरं कोणी नसून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. ते सुत्रसंचालन करत असलेला हा शो सगळ्यांना प्रचंड आवडतो. सध्या अमिताभ हे 'कौन बनेगा करोडपती 16' चं सुत्रसंचालन करत आहेत. फक्त या सीझनमध्ये नाही तर अमिताभ हे प्रत्येकवेळी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे करत असतात. पण आता हा सीझन इथेच संपणार आहे. यावेळी बिग बी भावूक झाले आणि ते यावेळी म्हणाले 'पुढच्या फेरीत मी तुला भेटेन'

अमिताभ बच्चन यांनी या आधी एक ट्वीट करत चाहत्यांना घाबरवलं होतं. जेव्हा त्यांनी जाण्याची वेळ आली असं म्हटलं होतं. ही वेगळी गोष्ट आहे की त्यांनी नंतर 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये ला रामराम करताना भावूक झाले आहेत. निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हणाले की ते पुढच्या सीझनमध्ये पुन्हा येणार आहेत. या आधी असं म्हटलं जात होतं की ते या शोच्या पुढच्या सीझनचं सुत्रसंचालन करणार नाहीत. 

या व्हिडीओत अमिताभ म्हणाले, 'प्रत्येक टप्प्याच्या सुरूवातीला एक विचार मनात येतो, इतक्या वर्षांनंतर, मी अजूनही ते प्रेम, ती साथ, ती उब प्रेक्षकांच्या डोळ्यात पाहू शकेन का? आणि प्रत्येक टप्प्याच्या शेवटी, महत्त्वाटी गोष्ट म्हणजे हा प्रवास, हा टप्पा आणि जे काही मला मिळालं आहे, ते माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. तर तो सतत मिळतच राहतो माझी हीच आशा आहे. हे सगळं असचं टिकून राहिल आणि कधीच कमी होणार नाही ही इच्छा.'

82 वर्षांचे अभिनेता म्हणाले, 'जेव्हा मी निरोप घेतोय, तेव्हा मी फक्त हेच सांगू शकेन की जर आमच्या प्रयत्नांनी कोणाच्या जीवनात काही बदल किंवा काही हातभार लागत असेल, तर मी आमच्या 25 वर्षांच्या प्रवासाला खरंच यशस्वी मानतो. तर, देवियंनो आणि सज्जनांनो, मी तुम्हाला पुढील सीझनमध्ये भेटेन. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, तुमचं स्वप्न जिवंत ठेवा. थांबू नका, वाकू नका. तुम्ही जसे आहात तसेच महत्त्वाचे आहात, माझ्यासाठी प्रिय आहात आणि माझे आहेत. पुन्हा भेटेपर्यंत, मी अमिताभ बच्चन, माझ्या शेवटच्या शब्दांनुसार- शुभ रात्री, या सीझनला समाप्त करत आहे.'

हेही वाचा : पिकलबॉल खेळताना अभिनेत्री भाग्यश्रीला दुखापत, करावी लागली सर्जरी अन् 13 टाके...

दरम्यान, अमिताभ बच्चन हे 2000 पासून या शोचं सुत्रसंचालन करत आहेत. फक्त तिसऱ्या सीझनला शाहरुख खाननं या शोचं सुत्रसंचालन केलं होतं. 

Read More