Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पंचायत 4' च्या सचिवजीला 'जीतू भैया' चा टॅग कसा मिळाला? स्वत: जितेंद्र कुमारनं केला खुलासा

Jitendra Kumar : जितेंद्र कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

'पंचायत 4' च्या सचिवजीला 'जीतू भैया' चा टॅग कसा मिळाला? स्वत: जितेंद्र कुमारनं केला खुलासा

Jitendra Kumar : ‘पंचायत सीजन 4’ चा प्रीमियर 24 जून रोजी होणार आहे. अशात एका लोकप्रिय सीरिजमध्ये सचिवजी ही भूमिका साकारणारे जितेंद्र कुमार एका छोट्या शहरातील गोष्टी आणि दमदार अभिनय याला सगळ्याला घेऊन चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जितेंद्र कुमारनं आतापर्यंतचा त्याचा प्रवास आणि त्याला मिळालेल्या आयकॉनिक स्क्रीन नाव 'जीतू भैया' या सगळ्यावर चर्चा केली आहे. 

जीतू भैया हा टॅग मिळाल्यानंतर काय म्हणाले जितेंद्र कुमार? 

'कोटा फॅक्ट्री' सीरिज जितेंद्र कुमारला चांगलीच लोकप्रियता मिळाली आणि या शोमुळे त्याला 'जीतू भैया' ही भूमिका साकारली होती आणि त्याला याच नावानं लोक ओळखतात. जितेंद्र कुमारनं ही मुलाखत 'झूम'ला दिली होती. यावेळी त्यानं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. एका मुलाखती दरम्यान, 'जितेंद्र कुमारनं त्याला मिळालेल्या या 'जीतू भैया' टॅगविषयी वक्तव्य केलं. ते तर कोटा फॅक्ट्रीमध्ये मी जी भूमिका साकारली जीतू भैया त्यावरून ते नाव लोकप्रिय झालं. पण मला वाटतं की सुरुवातीला बोलायचे की तुझ्या भूमिकेला दुसरं काही नाव देण्या पेक्षा जीतू दे. ते लवकर तोंडात येतं.' 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jitendra Kumar (@jitendrak1)

पंचायत आणि कोटा फॅक्ट्रीनं तो क्रिएटिव्ह स्पेस दिला जे त्याला नेहमीत हवं होतं. जितेंद्र कुमारनं पुढे सांगितलं की मी अशा भूमिकेची प्रतिक्षा करत होतो, जे असं वेगवेगळं काम करण्याची संधी देतात. पंचायत आणि कोटा फॅक्ट्रीसोबत मला ही संधी मिळाली. सीन, पटकथा, सगळं काही योग्य होतं. तर हा तोच कॉन्टेट आहे ज्याच्याशी सगळे जोडले जातात आणि मला वाटतं की हेच ते कारण आहे जे प्रेक्षकांना जोडून ठेवतात. 

जितेंद्रनं सुरुवातीच्या त्याच्या काळाविषयी सांगितलं. त्यानं म्हटलं की यूट्यूबवर 'माझ्या स्केचनं ऑडियन्स बनवण्यात खूप मदत झाली. त्यामुळे चांगला ऑडियन्स बेस तयार झाला. ज्यानंतर पंचायत सारख्या शोला त्या सगळ्या प्रेक्षकांचा सपोर्ट मिळाला. त्यांनी ट्रॅक केलं की मी कुठे आहे, माझं काम कसं डेव्हलप होतंय.'

हेही वाचा : 54 वर्षांपूर्वीचा 'तो' ब्लॉकबस्टर चित्रपट; 9 पैकी 3 गाणी सुपरहिट, प्रेक्षकांमध्ये आजही त्याची क्रेझ

जितेंद्रनं पुढे सांगितलं की 'पंचायत देव्हा आली तेव्हा हे घराघरात पोहोचलं. हा एक असा प्रवास होता ज्याचा आनंद लोकं घरू बसून आनंदानं घेतात. माझा प्रवास हा अनेक फेजमध्ये प्रेम आणि सपोर्ट वास्तव्य स्पेशल होतोय. मी आभारी आहे की त्यानं त्या गोष्टी सांगण्यासाठी इंस्पायर केलं जे मला कायम करायचं होतं.'

'पंचायत सीझन 4' मध्ये जीतेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक, चंदन रॉय, संविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा पुन्हा एकदा दिसणार आहे. 

Read More