Reema Lagoo and Vivek Lagoo : लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते विवेक लागू यांनी काल 19 जून वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं कारण काय हे अजून समोर आलेलं नाही. त्यांच्या पार्थीवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. तर त्यांच्या निधनाची बातमी ही पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली आहे. विवेक लागू यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला असून मनोरंजन क्षेत्रात सगळीकडे शोककळा पसरली आहे.
विवेक लागू हे दिवंग अभिनेत्री रीमा लागू यांचे पती होते. विवेक आणि रीमा यांनी मराठी चित्रपटसृष्टीत बरीच वर्षे काम केलं. दोघांनी अनेक मालिका आणि चित्रपटसृष्टीत स्वत: चं स्थान निर्माण केलं होतं. रीमा यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्या चित्रपटसृष्टीत 'आई'च्या भूमिकेत जास्त दिसल्या. पण दुसरीकडे त्यांचे पती विवेक लागू यांच्याविषयी सगळ्यांना जास्त माहिती नाही. विवेक आणि रीमा यांची प्यारवाली लव्ह स्टोरी कुठे आणि कशी सुरु झाली याविषयी जाणून घेऊया.
विवेक लागू आणि रीमा लागू यांनी बॅंकेत काम करत असताना अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1978 मध्ये रीमा आणि विवेक लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. मात्र, मुलीच्या जन्माच्या काही वर्षानंतर त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. त्या दोघांनी खूप विचार करून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी त्यादोघांपैकी कोणीही अधिकृतरित्या घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं नाही. काहीही असलं तरी मुलीसाठी ते नेहमीच एकत्र यायचे. तर विवेक यांनी स्वत: हून मुलीची जबाबदारी ही रीना यांना दिली.
2014 मध्ये 'दुसरा सिलसिला' या नाटकात विवेक आणि रीमा यांनी एकत्र काम केलं होतं. घटस्फोटानंतरही त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. घटस्फोटानंतर दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला नाही. 'प्रेम आणि लग्न एकदाच होतं. ते एकदा संपलं की संपलं', असं विवेक लागू यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
विवेक लागू आणि रीमा यांच्या मुलीविषयी बोलायचं झालं तर तिचं नाव मृण्मयी आहे. तर घटस्फोटानंतर रीमा या मृण्मयीला सिंगल मदर म्हणून सांभाळत होत्या. रीमा यांचं 2017 मध्ये हार्ट अटॅकमुळे निधन झालं.
हेही वाचा : दिग्गज अभिनेते विवेक लागू यांचे निधन; वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आईच्या निधनानंतर मृण्मयीनं वडिलांची काळजी घेतली.तिनं आई-वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत नाटक, अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात करिअर केलं. मृण्मयीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं हिंदीत थप्पड, स्कुप सारख्या चित्रपटांची ती लेखिका आहे.