Salman Khan Trolls Seema Sajdeh : कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कॉमेडी शोचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी पहिल्याच एपिसोडमध्ये सलमान खाननं हजेरी लावली होती. पहिल्या एपिसोडमध्येच सलमान खान आल्यानं प्रेक्षकांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. या एपिसोडमध्ये सलमान खाननं प्रचंड मस्ती केली. या दरम्यान, सलमाननं त्याचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या Ex पत्नीवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सलमान खान सांगत होता की त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. त्यानं सांगितलं की एकदा अविनाश गोवारिकर, जे लोकप्रिय फोटोग्राफर आहेत. ते मुंबईत राहण्यासाठी घराच्या शोधात होते. तेव्हा त्यांनी काही दिवस राहण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जागा मागितली. या दरम्यान, तो घराच्या शोधात होता. पण बरीच वर्ष तो घरातून निघाला नाही. त्याला घरातलं वातावरण इतकं आवडलं की तो तिथेच थांबला. सलमाननं सांगितलं की या दरम्यान, सोहेलनं पळून लग्न केलं होतं. आता ती पण पळून गेली. (सलमान यावेळी सोहेलची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सचदेहवर हे वक्तव्य केलं.) सलमाननं केलेल्या या मस्करीवर अर्चना पूरनसिंह आणि नवजोत सिंह सिद्धू यांना हसू अनावर झालं.
सोहेल आणि सीमानं 1998 मध्ये सोहेल आणि सीमानं घरातून पळून लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांचं लग्न करण्यात आलं. लग्नानंतर 2001 मध्ये त्यांचा मोठा मुलगा निर्वानचा जन्म झाला आणि 2011 मध्ये सरोगसीनं छोटा मुलगा युवानचा जन्म झाली. तर त्या दोघांचं नातं हे खूप चांगलं होतं. सगळ्यांना देखील त्यांच्याकडे पाहून ते आयडल कपल आहेत असं वाटत होतं. आपल्या नेटफ्लिक्सच्या शो दरम्यान, सीमानं जगाला सांगितलं की ती आणि सोहेल विभक्त झाले आहेत. आता सीमा तिच्या आयुष्यात पुढे निघाली असून प्रेमाची एन्ट्री तिच्या आयुष्यात झाली आहे.
हेही वाचा : 'हा' आहे बॉलिवूडचा सगळ्यात फ्लॉप हीरो; 270 पैकी 180 चित्रपट फ्लॉप, तरी 1010000000 संपत्तीचा मालक
दरम्यान, सलमाननं आमिरच्या लग्नावर देखील वक्तव्य केलं आहे. कपिलनं तुझ्या आयुष्यात कोणती गौरी आहे का असा प्रश्न विचारता त्यानं हा विषय थेट आमिरवर नेला. 'आमिर आहेच तितका भारी. तो एक चांगला माणूस आहे. संपूर्ण जगाला माहित आहे की तो एक परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत तो लग्न परफेक्ट करत नाही, तो पर्यंत करतच राहणार. मला वाटतं की ही त्याची शेवटची आहे. हे परफेक्त असेल. तो परफेक्ट होऊनच थांबणार.' सलमान खाननं केलेलं हे वक्तव्य ऐकून सगळ्यांना हसू अनावर झालं.