Shoaib Ibrahim Hits Back on Trollers : पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यात 26 लोकांची गोळ्या झाडत हत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शोएब इब्राहिम आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका कक्कड ट्रोल होत आहेत. कारण पहलगाम हल्ल्याच्या आधी त्यांनी एक पोस्ट केली होती त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात येतं होतं. आता शोएब इब्राहिमनं केलेल्या या कमेंट्सवर उत्तर दिलं.
शोएब इब्राहिमनं नुकत्याच त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात असं म्हटलं आहे की 26 निष्पाप लोकांची हत्या झाली या बातमीचं इतरं भारतीयाप्रमाणे आम्हालाही दु:ख आहे. तर आम्ही सुद्धा या प्रकरणात असलेल्या दोषी असलेल्या लोकांना शिक्षा मिळायला हवी आणि ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. त्यानंतर त्यांनी खुलासा केला की कशा प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांनविषयी बोलतोय कारण रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की दहशतवाद्यांनी फक्त हिंदू पुरुषांवर निशाणा साधला. शोएबनं सांगितलं की लोकं त्याच्या जवळ आले आणि त्याला पाकिस्तानला जा असं म्हणू लागले.
याच व्लॉगमध्ये शोएबनं ट्रोल्सविषयी सांगितलं. त्याला आणि दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय कारण त्यांनी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ते सुखरुप आहेत त्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. शोएब आणि दीपिका कश्मीरमध्ये फिरायला गेले होते आणि ते पहलगामला देखील गेले होते. जिथून ते 22 एप्रिल रोजी परतले. त्यानंतर शोएबनं इन्स्टाग्राम स्टोरी टाकली आणि तो सुरक्षित याची माहिती दिली. तर त्यानं या मागचं कारण त्याचे चाहते चिंतित होते हे सांगितलं आहे. त्याशिवाय त्यानं हे देखील सांगितलं होतं की तो लवकरच यावर व्लॉग बनवणार आहे.
या विषयी बोलताना शोएब इब्राहिमनं खुलासा केला की शोएब आणि दीपिका आपल्या कुटुंबासोबत दिल्ली पोहोचले होते. तेव्हा रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जाऊ लागलं होतं की पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 2-3 लोकं गंभीर जखमी आहेत आणि संपूर्ण बातमी येईपर्यंत तिथे खूप काही घडलं होतं. शोएबनं सांगितलं की त्याचे आणि दीपिकाचे चाहते चिंतित होते आणि त्यांनी त्या दोघांना मेसेज करण्यास सुरुवात केली. हे पाहता शोएबनं त्याला काही माहित नसताना अर्थात जिथे 26 लोकांची हत्या झाली या विषयी काही माहिती नसताना त्यानं एक स्टोरी शेअर केली. त्यानंतर शोएबला या घटनेचं गांभीर्य कळालं आणि त्याला धक्का बसला. पण त्यानं स्टोरी डिलीट केली नाही कारण त्याला कोणत्याही प्रकारे याचा व्लॉग प्रमोट करायचा असा विचार आला नव्हता. इतकंच नाही तर त्यानं हे देखील सांगितलं की लोकं त्याला पाकिस्तानमध्ये जा असं सांगत आहेत.
हेही वाचा : विराट आणि अनुष्का लंडनमध्ये का झाले शिफ्ट? माधुरी दीक्षितचा नवरा कारण सांगत म्हणाला, 'ते भारतात..'
शोएब इब्राहिमनं सांगितलं की त्याला आणि त्याच्या पत्नीला खूप ट्रोल करण्यात आलं आणि हे देखील सांगितलं की जे त्याचे फॉलोवर्स नाहीत त्यांनी देखील त्यांना खूप ट्रोल केलं. इतकंच नाही तर त्या लोकांना माहितही नाही की या सगळ्या घटनेवर शोएब आणि दीपिकानं व्लॉग बनवला आहे की नाही. त्यानं पुढे लोकांना प्रश्न विचारला की ते अशा प्रकरणात ट्रोल कसं करू शकतात. त्यानं हे देखील सांगितलं की त्याला आणि दीपिकाला तिच्या कपड्यांवरून, बसण्यावरून, उभं राहण्याच्या पद्धतीवरून ट्रोल का केलं जातं.