Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतला घरी 'या' नावाने मारायचे हाक; पाहा त्याची टोपण नावे

आज 14 जून 2024 रोजी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची पाचवी पुण्यतिथी आहे. 2020 साली याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला. तुम्हाला माहिती आहे का, सुशांतला त्याच्या घरी आणि जवळच्या मित्रमंडळींकडून वेगळ्याच नावाने हाक मारली जायची?  

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतला घरी 'या' नावाने मारायचे हाक; पाहा त्याची टोपण नावे

Sushant Singh Rajput: 2020 मध्ये कोरोनाच्या महाभयंकर संकटात देश अडकला असताना, त्या कठीण काळातच एक हसतमुख, हुशार आणि प्रतिभावान अभिनेता आपल्यातून निघून गेला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश सुन्न झाला होता. सुशांत जरी आज आपल्यात नसला तरी त्याचे स्मितहास्य, तेजस्वी डोळे आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे.

आजही त्याने इतका मोठा निर्णय का घेतला, हे कोडे कायम आहे

सुशांत नेहमीच आपल्या चाहत्यांना आणि मित्रांना आनंदाने भेटायचा. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नेहमीच 'हसमुख' म्हणून ओळखले. फार कमी लोकांना माहित आहे की, त्याला घरी 'गुलशन' या नावाने बोलावले जात असे. त्याचे वडील, बहिणी आणि घरातील सदस्य याच टोपण नावाने त्याला हाक मारायचे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले होते.

याशिवाय, त्याचे दुसरे टोपण नाव 'गुड्डू' देखील होते. त्याचे मित्र त्याला 'सेंट कॅरेंसचा एल्युमनी', 'राजीव नगरचा छोरा' आणि 'कॅप्टन' अशा नावांनी हाक मारायचे.

सुशांत सिंग राजपूतचा जन्म पाटणामध्ये कृष्ण कुमार सिंग आणि उषा सिंग यांच्या पोटी झाला. त्यांचे वडिलोपार्जित घर पाटणा जिल्ह्यात आहे. वडील एक निवृत्त तांत्रिक अधिकारी होते. सुशांत हा पाच भावंडांमध्ये सर्वात लहान होता.

हे ही वाचा: 'मी दर महिन्याला गर्भवती असायचे....' म्हणणाऱ्या अभिनेत्रीला आता आई व्हायचेच नाही, आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार

14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतील वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळला. प्राथमिक तपासणीनुसार, आत्महत्या हे कारण म्हणून समोर आले. तसेच, तो काही दिवसांपासून नैराश्यामध्ये असल्याचंही सांगण्यात आलं. त्याच्या मृत्यूबाबत मोठ्या प्रमाणावर चौकशी झाली आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण गुदमरल्याने झाल्याचं नमूद करण्यात आलं.

त्याच्या अचानक जाण्याने देशभरात प्रचंड खळबळ उडाली

सुशांतने टेलिव्हिजनपासून चित्रपटसृष्टीपर्यंत एक ठसा उमटवला. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. ज्यात त्याच्यासोबत अंकिता लोखंडे होती. अंकिता लोखंडे आणि सुशांत त्यानंतर काही काळ एकत्र देखील होते. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे ते दोघे वेगळे झाले. नंतर त्याने 'काय पो चे', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे', 'केदारनाथ', 'पीके' अशा दमदार चित्रपटांमध्ये काम केले. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' होता. हा चित्रपट त्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर रिलीज झाला. या यशस्वी चित्रपटांतून सुशांतने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. 

अभिनयाच्या जोडीला त्याला अंतराळ विज्ञान, खगोलशास्त्र यामध्येही विशेष रस होता. त्याच्या बाल्कनीत दुर्बिणीच्या माध्यमातून तो चंद्र-ताऱ्यांचा अभ्यास करत असे आणि यासंदर्भातील पुस्तके वाचण्यातही त्याला विशेष आवड होती.

Read More