Ashok Saraf : मराठी इंडस्ट्री किंवा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री हे कुठेन कुठे मागे पडली आहे का? कारण की ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. नेटफ्लिक्स किंवा वेगवेगळ्या ज्या ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. ज्यामध्ये सिरीजचा एक वर्ल्ड आला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक चित्रपट पाहण्यासाठी या ओटीटी फ्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसत आहेत. घरात बसून लोकं यावर चित्रपट किंवा सिरीज बघताना दिसत आहेत. यावर बोलताना अशोक सराफ यांनी म्हटलं आहे की, मुळात अशी गोष्ट झाली आहे की, ओटीटीवर कोणताही चित्रपट किंवा सिरीज ही घरात बसून बघायला मिळते. आपल्या वेळेनुसार ओटीटीवर चित्रपट किंवा इतर कोणत्याही गोष्टी बघायला मिळत असल्यामुळे ते प्रसिद्ध होणारच ना. चित्रपटांचं कसं आहे की, चित्रपट पाहण्यासाठी वेळ पाळावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला वेळेवर पोहोचावे लागते. त्याचबरोबर तिथे जावून तिकीट काढावं लागतं. त्यामुळे ओटीटीवर तस काही होत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ओटीटीवर ज्या सिरीज बनतात त्या इतक्या लिमिटेड असतात आणि इतक्या बांधीव असतात की त्या लोकांना आवडणं हे निश्चित आहे. मात्र, चित्रपटाचं तस होत नाही. चित्रपटाची कथा ही छान असेल तर लोकांना आवडते. जर चित्रपटाची कथा ही खूप लांब असेल आणि ती जर प्रेक्षकांना नाही आवडली तर चित्रपट फ्लॉप होतात.
ओटीटीमुळे सिनेमा धोक्यात?
सिनेमा तर होतात लोकं बघतात आणि करतात पण हे प्रमाण कमी झालं आहे. पण धोक्यात आहे असं म्हणणार नाही. अजून प्रोडक्शन चालू आहेत. लोकं चित्रपट करत आहेत. पण हिट होण्याच्या दृष्टीने असं म्हटलं की सक्सेसफुल होईल असं म्हणता येणार नाही.
साऊथ बॉलिवूड पेक्षा पुढे का?
एक तर ते लोक स्टोरी त्याची फार हे असते कंटेंट जो असतो ना ते टेक्निकचा जास्त उपयोग करून ते बसवतात. म्हणजे फायटिंग आणि हे जे लोकांनी चमत्कारिक जे म्हणजे ज्याचा टेक्निकली जास्त वापर केला असेल तर हे लोक बघायला आवडते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पिरिट काय असत त्या लोकांमध्ये स्पिरिट आहे की आपले चित्रपट हे आपण बघायलाच पाहिजे. तसं मराठीमध्ये आढळत नाही. मराठी प्रेफरन्स देतो त्याच्यात की आपण ही इंग्लिश बघूया किंवा हिंदी बघू या. टीव्ही सिरियल बघूया. मराठी चित्रपट नंतर असं झालेलं आहे. त्यामुळे काय होतं मराठी चित्रपट बघितला कमी जातो. पण साऊथमध्ये माणूस त्यांचा चित्रपट त्यांच्या भाषेत बघणार म्हणजे बघणारच.
कारण एक असं आहे बेंगलोरमध्ये एक रोड आहे एमजी रोड. तिथे दहा थिएटर लाईनमध्ये आहेत. त्यापैकी नऊ थिएटरमध्ये कन्नड चित्रपट चालू असतात. तर एका थिएटरमध्ये फक्त एक हिंदी चित्रपट चालू असतो. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचा बाकी कोणाचा नाही. याच्यावरून कळत की लोकं काय बघतात. तिथे नऊ थिएटर हाऊसफुल चालतात. त्यामुळे लोकांना आवडतील असे चित्रपट बनवले पाहिजेत. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे लोकांची आवड काय आहे हे समजून घेणं खूप कठीण आहे. त्यामुळे तुमचं कथासूत्र जे काही आहे, ते सादर करण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे. मराठी लोकांना चित्रपटाची कथा पाहून चित्रपट पाहण्यासाठी जाण्याची आवड आहे. कथेत तुम्हाला काय सांगायचं आहे हे लोकांना जास्त आवडते.