उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील घाघरा नदी म्हशींना आंघोळीचा घेऊन गेलेल्या मुलावर मगरीने हल्ला केला आहे. मगरीने या मुलाला नदीत खेचून लिहिलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार रविवारी संध्याकाळी उमगी बेगमगंज ठाणे क्षेत्रातील सोनौली मोहम्मदपुर गावात घडला आहे. पोलीस नरेंद्र प्रताप राय यांनी सांगितलं की, गावात राहणारा कुंवर बहादुर यादव यांचा मुलगा राजा बाबू उर्फ नाना यादव जो 13 वर्षांता होता. तो नदीच्या किनाऱ्या म्हशींना घेऊन गेला होता. तेव्हा एक मगर अचानक पाण्यातून बाहेर आली आणि जबड्यात मुलाला खेचून घेऊन गेली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. जवळपास 5 तांस शोधमोहिम राबवली गेली. पण मुलाची कोणतीच माहिती मिळाली नाही. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिम सुरु करण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार मगरीने पहिलं त्या मुलाच्या पायाला पकडलं आणि त्याला जबड्यात ओढून घेतलं. मुलाला खाली पाडल्यानंतर त्याची मान पकडली आणि पाण्यात खेचून नेलं. हे सगळं इतकं अचानक झालं की, मुलाला सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. गावकऱ्यांनी गोंधळ घालून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. मुलाला वाचवण्यासाठी कुणीच पाण्यात जाण्याची हिंमत केली नाही.
उत्तर प्रदेश –
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) June 23, 2025
जिला गोंडा में घाघरा नदी किनारे भैंस नहलाने गए 13 वर्षीय राजा बाबू उर्फ नान यादव को मगरमच्छ खींचकर ले गया। एक Video में मगरमच्छ और बच्चे का सिर मामूली दिखता है। फिर दोनों लापता हो जाते हैं। कल से तलाश जारी है। pic.twitter.com/Bqi3RzXAJo
एका महिन्यातील ही दुसरी घटाना आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये मगर मुलाला धरून पाण्यात ओढत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये मुलाचे डोके काही सेकंदांसाठी पाण्याच्या वर येते, त्यानंतर मगर त्याला खाली खेचते आणि काही वेळाने दोघेही नदीत पूर्णपणे गायब होतात. हा परिसर घाघरा नदीच्या काठावर आहे आणि स्थानिक लोकांच्या मते, नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने गावाभोवती मगरींची हालचाल वाढते. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की या भागात मगरी अनेकदा दिसतात आणि गेल्या एका महिन्यात अशी ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.