Marathi News> भारत
Advertisement

'...त्यापेक्षा शहीद झाली असती तर बरं झालं असतं,' पत्नी इराणमधून भारतात परतल्यानंतर पतीचं विधान, 'त्या पवित्र भूमीला...'

Iran-Israel War: इराणमधून सुरक्षित परतलेल्या महिलेच्या पतीचं म्हणणं आहे की, ती त्या जमिनीवर शहीद झाली असती तर जास्त बरं झालं असतं. इराणच्या भूमीवर मृत्यू व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं त्याचं म्हणणं आहे.   

'...त्यापेक्षा शहीद झाली असती तर बरं झालं असतं,' पत्नी इराणमधून भारतात परतल्यानंतर पतीचं विधान, 'त्या पवित्र भूमीला...'

Israel Iran War: इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या संघर्ष पेटला असून, तेथील लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. यादरम्यान तेथील भारतीय मायदेशी परतत आहेत. भारतात परतणाऱ्यांनी सरकार आणि दूतावासाचे आभार मानले आहेत. मात्र यात काही भारतीय असे आहेत ज्यांना इराणच्या भूमीवर आलेलं मरणं चांगलं असं वाटत आहे. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात, भारत सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' चालवत आहे. दरम्यान, काही लोक इराणच्या 'पवित्र' भूमीवर शहीद होण्याची वेळ आली आहे, शहीद होण्यापेक्षा चांगला मृत्यू नाही असं म्हणत आहेत.

दिल्लीतील रहिवासी निदाच्या पतीचंही हेच म्हणणं आहे. पत्नी इराणमधून परतल्यानंतर तिला नेण्यासाठी तो दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतातील लोकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे. आज भारतीयांची तिसरी तुकडी दिल्ली विमानतळावर दाखल झाली, ज्यामध्ये 56 भारतीय होते.

'इराणमध्ये मृत्यू झाल्यास अमर झाली असती'

इराणमधून परतलेल्या कुटुंबात निदादेखील आहे. तिला पती दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. निदाच्या पतीने म्हटलं आहे की, "माणूस शहीद होऊन अमर होते. शहीद होण्यापेक्षा चांगला मृत्यू नाही. येथे येण्यापेक्षा तिथे झालेला मृत्यू चांगला आहे. जो तिथे मरतो, ते शहीद होतो. इराणची जमीन पवित्र आहे. अजूनही तिथे शहीद होण्यासाठी संधी आहे".

निदाने सांगितला भारतात परत येण्याचा प्रवास

दिल्लीतील रहिवासी निदाने माहिती दिली की, ती 3 जून रोजी इराणला गेली होती. तिथे तिने सरकारकडे मदत मागितली. इराणमधील नेटवर्क धीमं झाल्याने ती कोणाशीही बोलू शकली नाही. त्यामुळे भारतात परतल्यावर तिने मनापासून सरकारचे आभार मानले. निदा म्हणाली की, फक्त सीमेवर अडथळ्यांचा सामना करावा लागला नंतर ती सुरक्षितपणे भारतात परतली.

त्याच वेळी, निदाचा पती पत्नीच्या इराणमधील वास्तव्याचा उल्लेख चांगला म्हणून करत आहे. त्याने सांगितले की आता इराणच्या पवित्र भूमीवर शहीद होण्याची वेळ आली आहे. निदाच्या पतीनुसार, तिथेही शांतता आहे. फक्त कनेक्टिव्हिटी नाही. आमचे सुप्रीम लीडर म्हणाले की एखाद्या व्यक्तीसाठी शहीद होण्यापेक्षा चांगले काय असू शकते. शहीद होऊन, व्यक्ती अमर राहील.

'वेळ येईल तेव्हा आम्हीही भारतासाठी शहीद होऊ'

निदाच्या नवऱ्याचं म्हणणं आहे की, "आमच्या शियांमध्ये, आम्हाला शहीद होण्यापेक्षा चांगला मृत्यू नाही असं वाटतं. इथे येण्यापेक्षा तिथे शहीद होणं चांगलं होतं. कोणीतरी अमर होणे ही वेगळी बाब आहे. वेळ येईल तेव्हा आम्हीही भारतासाठी शहीद होऊ. आता तिथे शहीद होण्याची वेळ आली आहे."

Read More