गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचा विमान कोसळलं. यामध्ये क्रू मेंबर्ससह 242 लोकांचा समावेश होता. दुपारी दीडच्या सुमारास या विमानाने उड्डाण केलं आणि अवघ्या 4 मिनिटांच कोसळलं. एअर इंडियाचं AI 171 हे विमान अहमदाबादवरुन लंडलना निघाले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. त्यांचे या दुर्घटनेत निधन झाल्याच पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेवर युट्यूबवर ध्रुव राठी यांनी एक शंका व्यक्त केली आहे. यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
लांब पल्ल्याचं विमान जाताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात येतं. अहमदाबाद येथे लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्याच काम झालं. त्यानंतर हा अपघात झाला आणि या अपघातात विमानाने पेट घेतला. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहेत. घटनास्थळी बचाव पथक सुरु असून हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. त्यामुळे या कॉलेजमधील विद्यार्थी अन् डॉक्टरांचा देखील समावेश आहे.
This is the first time in history that a B-787 Dreamliner plane has crashed.
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) June 12, 2025
It is considered to be one of the safest aircrafts. Absolutely Shocking!
इतिहासात पहिल्यांदाच बी-७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे. हे सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक मानले जाते. अगदी धक्कादायक! दोन वाक्याचं ध्रुवने ट्विट केलं आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान टेक ऑफ दरम्यान शहरातील मेघानीनगर परिसरात कोसळल्याचे समजते. अपघातानंतर दूरवर आकाशात धुराचे लोट दिसत होते. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. सध्या कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
उपलब्ध माहितीनुसार, विमानाने दुपारी १:३९ वाजता लंडनसाठी उड्डाण केले. याच वेळी हा अपघात झाला. हे ११ वर्षे जुने बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमान असल्याचेही माहिती आहे. विमानात एकूण २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी, २ पायलट आणि १२ क्रू मेंबर्स होते.
मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्याच वेळी, एनडीआरएफच्या ४ टीम अहमदाबादला रवाना करण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.