अहमदाबाद विमान अपघातात अनेकांची स्वप्न उद्ध्वस्त झाली. यामध्ये वडोदराचे वल्लभभाई अधेडा आणि त्यांची पत्नी वीनाबेन अधेडी लंडनमध्ये स्थायिक असलेल्या हीरल या मुलीकडे जात होते. त्यामुळे त्यांचा हा प्रवास नक्कीच खास होता. लेक आपल्या पालकांना अनेक महिन्यांनी भेटणार होती त्यामुळे तिची उत्सुकता देखील अधिक होती. पण अहमदाबाद विमान अपघातात या सगळ्यांचं स्वप्न कोलमडलं. दुर्घटनेत 242 प्रवाशांचा मृत्यू झाला यामध्ये या वृद्ध दाम्पत्याचा देखील समावेश आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या हीरलला जशी या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळळा.
अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटवणे खूप कठीण झाले. डीएनए चाचणीद्वारे वल्लभभाईंची ओळख पटवण्यात आली आहे, परंतु वीणाबेन यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. तपास यंत्रणा सतत प्रयत्न करत आहेत जेणेकरून कुटुंबाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येईल. मुलींनी ठरवले आहे की, त्यांच्या आईचा मृतदेह सापडताच दोघांवरही एकत्रितपणे अंत्यसंस्कार करता येईल.
लंडनमध्ये राहणाऱ्या हीरल अधेडाने आपल्या आई-वडिलांसाठी एक भावूक पत्र लिहिलं आहे. तिने या पत्रात म्हटलंय, कायम पालकांना मुलांचा अभिमान असतो. पण मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही कयाम स्वाभिमानाने आयुष्य जगलं. पप्पा कायमच म्हणायचे. आमच्यापैकी एकाचे निधन झाले तर दुसऱ्याचं काय होणार? मला वाटतं, देवाने त्यांची गोष्ट ऐकली. आणि या दोघांनाही एकत्र बोलावलं. लेकीच्या या भावूक पत्राने सगळ्यांच्याच मनाला स्पर्श केलं.
पत्रात हिरलने तिच्या वडिलांच्या कष्टाची आणि आईच्या प्रेमाची आठवण मांडली. तिने लिहिले की तिच्या वडिलांनी कधीही कोणाचीही मदत मागितली नाही. त्यांनी प्रत्येक जबाबदारी स्वतः सांभाळली आणि आपल्या मुलींना स्वावलंबी बनवले. पुढे ती लिहिते, "परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही हार मानायला शिकवले नाही. आता तुम्ही नाहीत, पण तुमची शिकवण आणि आठवणी आमची ताकद बनतील."
वल्लभभाई आणि वीणाबेन यांना तीन मुली आहेत. त्यांनी ठरवले आहे की, त्यांच्या आईचे पार्थिव सापडताच दोन्ही पालकांचे अंतिम संस्कार एकत्र केले जातील. या निर्णयाने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. ही केवळ श्रद्धांजली नाही तर एका मजबूत आणि सक्षम कुटुंबाचे उदाहरण आहे, ज्याने आपल्या दुःखाचे आत्मविश्वासात रूपांतर केले.
या अपघातात, अधेडाकुटुंबाप्रमाणेच, इतर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पण हिरलचे हे पत्र कायम स्मरणात राहील. ज्यामध्ये तिने तिच्या पालकांचा साधेपणा, स्वाभिमान आणि प्रेम जगासमोर मांडले आहे. ही घटना पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देते की जीवन किती क्षणभंगूर आहे आणि प्रियजनांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे.