Ahmedabad Air India plane crash Reason: एअर इंडियाच्या विमान अपघाताला 8 दिवस झाले आहेत. तरीही आतापर्यंत या दुर्घटनेचे कोणतेही अधिकृत ठोस कारण समोर आलेले नाही. त्याची चौकशी अजूनही सुरू आहे. 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या घटनेने देशासह संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-171 हे उड्डाणानंतर 30 सेकंदांनी मेघनी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. बोईंग 787 ड्रीमलायनरमध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ज्यात 241 लोकांचा मृत्यू झाला.
विमान अपघातादरम्यान एक माणूस वाचला. विमानातील प्रवाशांचा पेट्रोलमुळे लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. पण ही घटना अनेक प्रश्न मागे सोडून गेली. जे लोकांना त्रास देतायत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एवढी मोठी घटना कशी घडली? ही दुर्घटना फक्त तांत्रिक बिघाड होती का? की त्यामागे मोठा कट रचला गेला होता? या तपासाची तुलना 2020 च्या गॅटविक घटनेशी का केली जातेय? याबद्दल जाणून घेऊया.
12 जून रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 या विमानाच्या अपघाताची चौकशी करणारे तपासकर्ते फेब्रुवारी 2020 मध्ये गॅटविक येथे घडलेल्या एका घटनेकडे बारकाईने पाहत आहेत. ज्यामध्ये एअरबस A321 चा समावेश होता. ज्यामध्ये टेकऑफनंतर लगेचच दोन्ही इंजिन निकामी झाले. यामुळे, विमानाला गॅटविकला परत येण्यापूर्वी 11 मिनिटांनी परतावे लागले. 12 जून रोजी झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी अहमदाबादमध्ये यूके एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्रँच (एआयआयबी) काम करतेय. 2020 च्या तपासात इंजिन बिघाडाचे कारण इंधन प्रणालीतील दूषितता होती. पण त्या रात्री विमान उड्डाणासाठी परवानगी देण्यापूर्वी इंजिनिअर्सना कोणताही दोष आढळला नव्हता.
आतापर्यंत भारताचे एएआयबी, यूकेचे एएआयबी आणि यूएस एनटीएसबी पथके या अपघाताच्या तपासात सहभागी आहेत. विमानात वीज नसणे आणि दोन्ही इंजिनमध्ये बिघाड हे अपघाताचे मुख्य कारण असू शकते, हे सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे. तपासकर्ते त्याची तुलना 2020 च्या गॅटविक घटनेशी करत आहेत. जिथे इंधनात पाणी मिसळल्यामुळे एअरबस ए३२१ चे इंजिन निकामी झाले होते. त्यावेळी इंजिनिअर्सना उड्डाणापूर्वी कोणताही दोष आढळला नव्हता. एआय-171 च्या अवशेष आणि इंधन टाक्यांची रासायनिक तपासणी सुरू आहे. जर इंधनात पाणी किंवा गंज आढळला तर ते अपघाताचे एक प्रमुख कारण असू शकते. इंधन प्रदूषण हे वीज गळतीचे एक सामान्य कारण आहे, जे अनेकदा हवेत आढळते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर) सापडले आहेत. पण ते आग आणि स्फोटांमुळे इतके खराब झालंय की डेटा काढणे कठीण आहे. म्हणून ते अमेरिकेतील NTSB लॅबमध्ये पाठवले जाण्याची चर्चा आहे. ब्लॅक बॉक्स पायलटच्या शेवटच्या संभाषणाबद्दल, इंजिनची स्थिती आणि सिस्टमबद्दल माहिती देऊ शकतो. वीज बिघाड झाल्यास बॅकअप देणारे राम एअर टर्बाइन (RAT) चालू होते. पण ते 625 फूट कमी उंचीवर मदत करू शकले नाही. कारण सुरक्षित लँडिंगसाठी 3600-4900 फूट उंचीची आवश्यकता होती, असे तपासात असे दिसून आले.
सोशल मीडियावर कट रचण्याच्या चर्चा देखील खूप सुरू आहेत. काही यूजर्सचा असा दावा आहे की, हा अपघात नियोजित होता. विशेषतः कारण त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचादेखील मृत्यू झालाय. हा अपघात इंधन व्हॉल्व्ह बंद असल्याने झाला आणि त्यात राजकीय कट असू शकतो, अशी पोस्ट एक्सवर करण्यात आलीय. अमेरिका आणि पाकिस्तानने कट रचल्याचा दावा करण्यात आला होता पण हा दावा पुराव्याशिवाय आहे. अशा अफवा ठोस पुराव्याशिवाय विश्वासार्ह नाहीत. आतापर्यंतच्या तपासात कट रचल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
8200 उड्डाण तास उड्डाण करणारे पायलट सुमित सभरवाल आणि सह-पायलट क्लाइव्ह कुंदर, ज्यांना हजारो तास उड्डाणाचा अनुभव होता, दोघांनीही मॅन्युअल कंट्रोल वापरून विमानाला अपघातातून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण कमी उंचीमुळे विमान वाचवणे अशक्य होते. बोईंग 878 मध्ये, राम एअर टर्बाइन (RAT) बॅकअप पॉवर देते. पण त्यासाठी 3600-4900 फूट उंचीची आवश्यकता असते. तपासात कॉकपिटमध्ये कोणताही दोष आढळला नाही.
AI-171 ने अपघातापूर्वी 24-48 तासांत टोकियो, पॅरिस आणि दिल्ली येथे उड्डाण केले होते. या उड्डाणांचे तांत्रिक नोंदी तपासात तपासले जात आहेत. मागील वैमानिक किंवा इंजिनिअर्सना इंजिनमध्ये समस्या लक्षात आली का? ECAM (इलेक्ट्रॉनिक मॉनिटर) ने इशारा दिला होता का? एअर इंडियाच्या 34 बोईंग 787 पैकी 24 विमानांची नुकतीच तपासणी करण्यात आली आणि त्यात कोणताही मोठा दोष आढळला नाही. पण DGCA ने 34 एअर इंडिया बोईंग 787 विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे एअर इंडियाच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसलाय.
जागतिक स्तरावर, ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगालमधील नागरिकांच्या मृत्यूमुळे हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनलाय. आतापर्यंत या अपघाताचे कोणतेही ठोस कारण सापडलेले नाही. संपूर्ण चौकशीनंतरच या प्रकरणावर काही बोलता येईल. जेव्हा जेव्हा या अपघाताचे कारण समोर येईल तेव्हा भारतासह संपूर्ण जगात पुन्हा एकदा त्याची चर्चा होईल एवढ मात्र नक्की.