Asaduddin Owaisi: ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तान पुरता घाबरून गेला. या काळात देशातील नागरिक आणि एकमेकांवर सातत्याने टीका करणारे नेतेही देशासाठी एकत्र झाले.या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी.ओवैसी यांनी देशाच्या संकटाच्या काळात देशाची बाजू जोरकसपणे मांडली.पण आता हेच औवेसी पाकच्या टार्गेटवर आल्याचं समोर येतंय.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अचूक आखणी करत ऑपरेशन सिंदूर राबवलं. आणि दहशतवाद्यांना पोसणारा पाकचा खरा चेहरा पुन्हा समोर आणला. या सगळ्यात मुस्लीम चेहरा असलेले MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भारताची बाजू, लष्करी शौर्याचं कौतुक करत भारताच्या एकात्मतेचं दर्शन घडवलं.पण आपल्या देशाबाबतच्या असद्दुदिन ओवेसी यांच्या प्रेमामुळे पाकच्या पोटात दुखू लागलं. अनेकदा ओवेसी यांचे गोडवे गाणा-या पाकमधले नेते, मौलवी यांची आता भाषाच बदलली. औवेसी आता त्यांच्या रडारवर आले असून त्यांच्यावर पाकमधून सडकून टीका होतीये.
देशातील विविध मुद्द्यांवर ओवैसींचे सरकारशी अनेकदा आपण मतभेद पाहिलेत. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. हीच गोष्ट पाकिस्तानींना आता काट्यासारखी टोचत आहे.
ओवैसी हे देशातील त्या काही मुस्लिम नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी पाकिस्तानला वेळोवेळी उघडं पाडलंय. मात्र तरीही पाकिस्तानी यातून धडा घेत नाहीत आणि यावेळी ते इतके पुढे गेले की त्यांनी असदुद्दीन ओवैसींवर विष ओकायला सुरुवात केली.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी शिष्ठमंडळ तयार केलंय. यात एमआयएमचे नेते असद्दुदिन ओवेसी यांचाही सहभाग आहे. सध्या पाकमध्ये ओवेसींना टार्गेट केलं जात असलं तरी.भारत आणि ओवेसीही अशा पाकच्या धमक्यांना भिक घालणार नाही हे नक्की.