पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant mann) सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनच्या सूत्रात बदल करण्याची घोषणा केली. आता आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडली जात होती.
भगवंत मान म्हणाले की, बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. तरुण पदवी घेऊन घरी बसले आहेत. ज्यांनी जाब विचारला, त्यांच्यावर लाठीमार केला. त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीत ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही मोठी पावले उचलत आहोत.
Today, we have taken another big decision. The pension formula for Punjab's MLAs will be changed. MLAs will now be eligible for only one pension.
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 25, 2022
Thousands of crores of rupees which were being spent on MLA pensions will now be used to benefit the people of Punjab. pic.twitter.com/AdeAmAnR7E
ते म्हणाले की, आमदार हात जोडून मते मागतात. पण अनेक आमदार तीन वेळा जिंकले, चार वेळा जिंकले, 6 वेळा जिंकले, पण त्यांचा पराभव झाला. त्यांना दरमहा लाखो रुपये पेन्शन मिळते. काहींना 5 लाख तर काहींना 4 लाख पेन्शन मिळत आहे. काही लोक असे असतात, आधी खासदार होते, मग आमदार होते, दोघांचे पेन्शन घेत आहेत. अशा परिस्थितीत पंजाब सरकार मोठा निर्णय घेणार आहे.
ते म्हणाले की, कोणी कितीही वेळा जिंकले तरी आतापासून एकच पेन्शन मिळणार आहे. त्यातून वाचलेले कोट्यवधी रुपये लोकांच्या भल्यासाठी खर्च केले जातील. तसेच आमदारांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनातही कपात करण्याचा निर्णय घेतला जात आहे.