Marathi News> भारत
Advertisement

पंजाब काँग्रेसमध्ये कलह, सिद्धूंचं नेतृत्व कॅप्टन यांना अमान्य

पंजाब काँग्रेसमध्ये कलहाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये कलह, सिद्धूंचं नेतृत्व कॅप्टन यांना अमान्य

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवल्याच्या बातमीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून ते सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांना बोलावले.

हरीश रावत यांच्या सोनिया गांधींसमवेत झालेल्या भेटीत राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रादेखील उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर हरीश रावत म्हणाले की, त्यांनी सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याबाबत कधीही चर्चा केली नाही.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या गटाच्या सर्व नेत्यांना सिसवा फार्महाऊसमध्ये बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक खासदार आणि आमदार सिसवा फार्महाऊसमध्ये पोहोचले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री हाय कमांडला त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत की किती नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. 50 हून अधिक आमदार मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभे असल्याची माहितीही मिळाली आहे. याशिवाय पंजाबचे सर्व लोकसभा खासदार मुख्यमंत्र्यांसमवेत उभे आहेत.

वृत्त आहे की नवज्योतसिंग सिद्धू यांनी चंदीगडमध्ये पंजाब काँग्रेसच्या अनेक नेत्यांसमवेत बैठक घेतली आहे. पंजाबचे कॅबिनेट मंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. ज्यामध्ये पंजाब काँग्रेसचे 9 नेते उपस्थित होते.

पंजाब काँग्रेसमधील बदलांच्या वृत्तानुसार सिद्धू आणि कॅप्टन यांच्यातील वाद मिटविण्यासाठी 2 कार्यकारी अध्यक्ष करण्याचीही तयारी आहे. ज्यामध्ये एक कार्यकारी अध्यक्ष उच्च जातीचे आणि दुसरा दलित समाजातील असू शकतो.

वास्तविक पंजाबमध्ये अनुसूचित जाती समुदायाचा सहभाग सुमारे एक तृतीयांश आहे आणि बहुजन समाज पक्षाशी हातमिळवणी करून अकाली दलाने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. जर अकाली-बसपा हे समीकरण एंटी-इन्कंबेंसी वेव्ह बरोबर काम करत असेल तर यामुळे काँग्रेसचे बरेच नुकसान होऊ शकते. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक विचार करून हे धोरण नष्ट करण्यासाठी पक्षातील दोन कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे मानले जाते की, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सोनिया गांधी यांच्या शेवटच्या बैठकीत याच सूत्रावर चर्चा झाली. ज्यामध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीचा मुकाबला करण्यासाठी दोन कार्यकारी अध्यक्ष करण्याची तयारी सुरू होती.

प्रशांत किशोर आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर पंजाबमध्ये बदल करण्याच्या फॉर्म्युल्यावर सल्लामसलत झाला असून येत्या निवडणुकीत पंजाबमध्ये सिद्धू यांची गरज लक्षात घेता त्यांनी असावे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. पंजाबमध्ये सुनील जाखड हे प्रदेशाध्यक्ष आहेत. 2024 च्या तयारीसाठी ज्यांना दिल्लीला बोलवलं जावू शकतं. कारण पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचलसह अनेक राज्यांत जाखड यांचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं.

Read More