Patanjali Agricultural Model : पतंजलीचं अॅग्रीकल्चर मॉडेल आज भारतातल्या गावांच्या यशामागे एक महत्त्वाचा पाया बनत चालला आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वात पतंजलीनं 'नव हरित क्रांती – एन एग्रो व्हिजन' या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शेती सुलभ करणं हे उद्दिष्ट ठेऊन एक मोठं मॉडेल तयार केलं आहे. यामुळे शेतकरी मध्यस्थींपासून मुक्त होतात आणि त्यांना थेट फायदा मिळतो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते.
पतंजलीचं कृषी मॉडेल सेंद्रिय शेतीवर भर देतं, जे आपल्या पारंपरिक शेती पद्धतींवर आधारित आहे. या मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामुळे ते रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी करू शकतात. पतंजलीकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय खतं, उत्तम दर्जाची बियाणं आणि कमी दरात खते मिळतात, यामुळे त्यांचा खर्च कमी होतो आणि कमाई वाढते.
या मॉडेलमध्ये आयुर्वेद आणि पारंपरिक शेतीपद्धती यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं जातं. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांचं जीवन सुधारत नाही, तर आपल्या शेती परंपराही जपल्या जातात. पतंजलीचा हा उपक्रम भारतीय कृषी व्यवस्थेला एक नवी दिशा देतो, जिथे शाश्वत शेतीला प्रोत्साहन दिलं जातं.
पतंजलीनं अनेक सेंद्रिय उत्पादने विकसित केली आहेत, जी शेतकऱ्यांना मदत करतात. उदाहरणार्थ, ‘पतंजली बायो पोटाश प्लस’ हे एक द्रव स्वरूपातलं क्षार जैविक खत आहे, जे मातीतील क्षारची उपलब्धता वाढवतं. हे उत्पादन Fraturia aurantia नावाच्या बॅक्टेरियावर आधारित आहे, जे झाडांना पोटॅश शोषून घेण्यास मदत करतं आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करतं. अशा प्रकारची उत्पादने शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो आणि मातीचं आरोग्य चांगलं राहतं.
पतंजलीनं शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक तांत्रिक नवप्रयोग केले आहेत. त्यांनी असे ॲप्स विकसित केले आहेत, ज्याच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतांची जिओ-मॅपिंग, जिओ-फेन्सिंग आणि हवामानाची माहिती सहज मिळवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना पिकांची चांगली निगा राखता येते आणि बाजारसंबंधी माहिती मिळवणं सोपं होतं. पतंजलीनं शेतकरी आणि सरकार यांच्यातील अंतर कमी करण्याचंही काम केलं आहे. त्यांची ‘नव हरित क्रांती – एन एग्रो विजन’ योजना शेतकऱ्यांना माती परीक्षण, कृषी डिजिटायझेशन आणि पीएम किसानसारख्या सरकारी योजना पोहोचवण्यात मदत करते.
(This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s consumer connect initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)