Patanjali : भारताच्या टॉप कंपन्यांच्या लिस्टमध्ये असलेल्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड, ज्याची स्थापना बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी केली आहे. जे लोकांमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांचं काम हे केवळ बिझनेस पर्यंत सीमित नाही तर ते समाज कल्याणाच्या अनेक पैलूंमध्ये सहभागी आहेत, जे समाजाच्या भल्यासाठी आहेत. विशेषतः त्यांचं काम हे फक्त नफा कमावणे इथपर्यंत सीमित नाही. यामध्ये योग शिबिरे, आपत्ती निवारण, शिक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांचा समावेश आहे, ज्याद्वारे समाजाला फायदा मिळू शकतो.
तेव्हा जाणून घेऊयात पतंजली केवळ व्यवसायापुरते मर्यादित नाही तर समाजाच्या कल्याणासाठी देखील कसे काम करत आहे?
पतंजली योग पीठच्या माध्यमातून मोफत योगा शिबिरं आयोजीत करणे हे पतंजलीचे एक मोठे काम आहे. ही शिबिरं लोकांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करतात. विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना महागडे उपचार परवडत नाही. ही शिबिरं संपूर्ण भारतात होतात आणि लोकं याद्वारे योग शिकतात. जे ताण कमी करण्यासोबतच आजारांपासून वाचण्यास सुद्धा मदत होते. हे व्यवसायापेक्षा वेगळे आहे कारण येथे ते कोणतेही उत्पादन विकत नाहीत तर समाजाचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. जे समाजातील लोकांना दीर्घकालीन फायदे प्रदान करतात.
पतंजली आपत्ती व्यवस्थापनासाठी नेहमी तयार असते. पूर, भूकंप आणि इतर कोणतीही आपत्ती आली तरी यासाठी पतंजली आणि त्यांची टीम ही मदतीसाठी नेहमी पुढे असते. आपत्ती झालेल्या ठिकाणी पतंजलीकडून जेवण, कपडे, पाणी, औषधं तसेच इतर महत्वाच्या गोष्टी पोहोचवल्या जातात. जे अडचणीत येणाऱ्या लोकांना मदतीचा हात देतात. उदाहरण द्यायचं झालं तर 2013 च्या उत्तराखंड पुरात पतंजलीने अत्यावश्यक सामना पाठवले होते. हे व्यवसायाच्या पलीकडे जाणारे काम आहे कारण हे फक्त नफ्याशी संबंधित नाहीत तर मानवतेच्या सेवेने प्रेरित आहेत. यावरून असे दिसून येते की ते केवळ उत्पादने विकण्यापेक्षा समाजाला मदत करण्याला प्राधान्य देतात.
पतंजली शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान देत आहे. पतंजलीने शाळा उघडल्या आहेत आणि भारतीय संस्कृती आणि मूल्यांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. उदाहरण देऊन बोलायचे झाल्यास यूनिवर्सिटी ऑफ पतंजलि योग, आयुर्वेद, निसर्गोपचार इत्यादींचा अभ्यास शिकवते जिथे दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. जे विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात करिअर बनवण्यासाठी मदत करतात. पतंजली ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करत आहे. जेणेकरून मुलांना चांगले शिक्षण मिळेल आणि ते त्यांच्या संस्कृतीशी जोडलेले राहतील. हे व्यवसायापेक्षा वेगळे आहे कारण ते समाजाचे भविष्य बदलण्याबद्दल आणि विशेषतः तरुण पिढीला बळकट करण्याशी संबंधित आहे.
पतंजली सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देते, जे पर्यावरणासाठी चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना यामधून फायदा मिळतो. ते शेतकऱ्यांना प्रशिक्षण, बियाणे पुरवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे इत्यादी करतात. याचा समाजाला फायदा होतो कारण ते पर्यावरण वाचवण्यास मदत करते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करते. पतंजली झाडं लावणे, पाणी वाचवणे आणि इको-फ्रेंडली प्रोडक्टला प्रोत्साहन देणे. निसर्ग वाचवण्यासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जात आहेत. कंपनी जलशुद्धीकरण, पावसाचे पाणी साठवण आणि स्वच्छता मोहिमा यासारख्या प्रयत्नांद्वारे नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यास मदत करत आहे.