India-Pakistan Secret Trading : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात काही कठोर पावलं उचलली आहेत. जसे की व्यापार बंद करणे, हवाई मार्ग बंद करणे, व्हिजा रद्द करणे आणि पाण्याचा करार थांबवणे. भारत-पाकिस्तानंमध्ये व्यापार खूप कमी प्रमाणात होतो पण असा दावा करण्यात येत आहे. तर दोन्ही देशांमध्ये सीक्रेट व्यापार होतो आणि हा जवळपास 10 अब्ज डॉलरचा हा व्यापार होतो.
अल जजीराच्या रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तानमध्ये असलेले व्यापारी संबंध हे नेहमीच तनावपूर्ण होते. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार हा जवळपास बंद झाला. पण प्रश्न हा आहे की या दोन्ही देशांमध्ये किती व्यापार व्हायचा आणि सीमा सील केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर कसा परिणाम होणार.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 पासून व्यापार सुरू आहे. तर 1996 मध्ये भारताने पाकिस्तानला 'मोस्ट फेवर्ड नेशन' (MFN) हा दर्जा दिला आणि त्यानंतर व्यापार वाढला होता.व्यापारात वाढ झाली पण दोन्ही देशांमधील तनावामुळे व्यापार जास्त वाढू शकला नाही. तर 2017-2018 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 2.41 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आणि 2016-2017 मध्ये 2.27 अब्ज डॉलरचा व्यापार केला.
पण 2019 मधल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा MFN दर्जा काढून घेतला. त्यानंतर दोन्ही देशांमधील व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाले. 2018 मध्ये ते 2024 मध्ये दोन्ही देशांमध्ये 2.41 अब्ज डॉलरचा व्यापारावरून कमी होऊन 1.2 अब्ज डॉलरवर गेला. पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात 2019 मध्ये 547.5 मिलियन डॉलरवरून कमी होईल 2024 मध्ये फक्त 480,000 डॉलर झाली.
भारताच्या वाणिज्य मंत्रालयानुसार, एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत भारताची पाकिस्ताला निर्यात ही 447.7 मिलिय डॉलर होती. या दरम्यान, पाकिस्तानची भारताला असलेली निर्णात ही फक्त 420,000 डॉलर होती. भारतातून पाकिस्तानला औषधं, पेट्रोलियम, प्लास्टिक, रबर, रसायन, रंग, भाज्या, मसाले, चहा, कॉफी आणि धान्याची निर्यात होते. पाकिस्तानातून भारतात तांबं, काचेचं सामान, रसायणं, सल्फर, फळं, सुका मेवा इत्यादी गोष्टी निर्यात होतात.
GTRI चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितलं की भारतीय सामान हा दुबई, सिंगापूर, कोलंबो सारख्या ठिकाणी पाठवला जातो. तिथे हा सामान ड्यूटी-फ्री गोदामात ठेवण्यात येतो. त्यानंतर कागदपत्र आणि लेबल बदलून हा सामान नव्या लेबलसोबत पाकिस्तानमध्ये पाठवले जातात. श्रीवास्तव यांचं म्हणणं ाहे की अशा पद्धतीनं व्यापारी हे पैसे कमावतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा अप्रत्यक्षपणे व्यापार थांबवणं फार कठीण आहे. कारण हे सगळं तिसऱ्या देशात खासगी कंपन्यांमार्फत केलं जातं, सरकारची थेट भूमिका यात नसते. पण पाकिस्ताननं भारतासोबत तिसऱ्या देशातून होणारे व्यापारांवर बंदी आणली आहे. दोन्ही देशाचे
1965, 1971 आणि 2019 मध्ये युद्धानंतरही काही काळानंतर व्यापार पुन्हा सुरू झाला. याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की तणाव कमी झाल्यावर तिसऱ्या देशातून व्यापार परत सुरू होण्याची शक्यता नेहमीच असते.