India Pakistan War Latest Update : भारत आणि पाकिस्तान नात्यामध्ये निर्माण झालेली दरी आता आणखी रुंदावली असून, यामुळं दोन्ही देशांमध्ये असणारा दुरावा अतिशय कटू वळणावर आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी जनसामान्यांची मागणी असतानाच मोदी सरकारनंही पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं स्पष्ट होत आहे. इथं पाकिस्ताननं सर्वच स्तरांवर पाकिस्तानची कोंडी केलेली असतानाच आता पाकच्या अधिकाऱ्यांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांचाच थरकाप उडाला आहे. इतका की, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या देशाच्या मंत्र्यांनी साऱ्या देशाला खडबडून जागं केलं आहे. (Pahalgam Attack Latest Update)
पाकिस्तानचे सूचना मंत्री अताहउल्ला तरार यांनी X च्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर केला. जिथं, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत भारताकडून पाकिस्तानवर पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा त्यांनी देशापुढं मांडत चिंता व्यक्त केली.
हल्ल्याचं सावट असतानाही भारताविरोधात गरळ ओकत पाकिस्ताच्या या मंत्र्यांनी काही गंभार आरोप केले. कोणत्याही निष्पक्ष चौकशीशिवाय भारतानं थेट लष्करी पर्याय निवडण्याची तयारी दाखवली असून, यामुळं क्षेत्रीय शांतता भंग होऊ शकते आणि ही घातक बाब आहे असं ते म्हणाले. पाकिस्ताननं या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मदतीनं चौकशीची मागणी केली असून, भारत मात्र या मागणीला धुडकावत संघर्षाच्या वाटेवर निघाला असल्याची उलटी बोंब तरार यांनी ठोकली.
तिथं पाकिस्तानवर भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीचं सावट असतानाच दुसरीकडे शेजारी राष्ट्राचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीसुद्धा रॉयटर्सशी संवाज साधताना पाकिस्तान हाअ अलर्टवर असून भारतानं हल्ला केल्यास आपला देश त्याचं प्रत्युत्तर देईल असा पोकळ विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी अण्वस्त्रांचा वापर फक्त आणि फक्त देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न उद्भवल्यास केला जाईल असं म्हणत भारताला डिवचलं.
Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24-36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident.
— Attaullah Tarar (@TararAttaullah) April 29, 2025
Indian self assumed hubristic role of Judge, Jury and… pic.twitter.com/WVW6yhxTJ0
तिथं पाकिस्तानचा भीतीनं थरकाप उडालेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात देशातून दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी गरज भासल्यास आवश्यक कारवाईची मुभा सैन्यदलाला दिली आहे. ज्याअंतर्गत भारतीय सैन्याला ठिकाण, लक्ष्य आणि वेळ निवडण्याची मुभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता पंतप्रधानांनी दिलेली मुभा, पाकिस्तानच्या मनात असणारी भीती आणि सीमाभागातील तणाव पाहता पुढे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.