Pahalgam Terrorist Attack : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या सर्व तुकड्या सतर्क झाल्या. सोबतच नौदल आणि वायुदलही सतर्क असल्याचं पाहायला मिळालं. शेजारी राष्ट्राच्या प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर लक्ष ठेवलं जात असतानाच भारतातील वेस्टर्न कमांड हाय अलर्टवर असल्याचं वृत्त समोर आलं.
पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडसह संपूर्ण वेस्टर्न युद्धनौका ताफ्याला दक्षतेची सूचना देण्यात आली. महत्त्वाच्या युद्धनौका उच्च दर्जाच्या तयारीसह सज्ज झाल्या. पश्चिम नौदल हा नौदलाचा 'स्वॉर्ड' म्हणजेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा कमांड आहे. त्यामुळे पाकिस्तानशी निगडित कोणतीही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास कमांड सर्वप्रथम दक्षतेवर असतो, त्याच धर्तीवर यावेळीसुद्धा अशाच दक्षतेच्या सूचना कमांडला देण्यात आल्या आहेत. सूचना आणि सतर्कतेच्या या वातावरणात आयएनएस विक्रांत या भारतील नौदलातील विमानवाहू जहाजानंही सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
देशातील पहिलं स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरिअर आयएनएस विक्रांतचा प्रत्येक भाग विशेष असून, त्याची विशेष ताकदही आहे. या नौदलाच्या ताफ्यातील या विमानवाहू जहाजाच्या पाच महत्त्वाच्या गोष्टींमुळं त्याला देशाचा पाठीराखा म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.