Chandrayaan 5 Moon Mission :इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन (ISRO) चे अध्यक्ष वी नारायण यांनी रविवारी सांगितलं की केंद्र सरकारनं चांद्रयान-5 मिशनला परवानगी दिली आहे. ते बंगळुरुमध्ये ISRO चा पदाधिकार सांभाळल्यानंतर त्यांनी ही एका कार्यक्रमात चांद्रयान-5 मिशन विषयी वक्तव्य केलं आहे.
त्यांनी यावेळी सांगितलं की, 'तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान-5 मिशनसाठी मंजूरी मिळाली आहे. यामध्ये जपान आपला सहकारी असणार आहे. चांद्रयान-3 मिशनमध्ये 25 किलोग्राम वजनाचा रोव्हर (प्रज्ञान) पाठवला होता, तर चांद्रयान-5 मिशनमध्ये 250 किलोग्राम वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.'
नारायणन यांनी पुढील प्रोजेक्ट्सबद्दल सांगितले की, '2027 मध्ये लाँच होणाऱ्या चांद्रयान-4 मिशनचं उद्दिष्ट चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणणे आहे. याशिवाय, गगनयान आणि अन्य अनेक मिशनसह भारताचे आपले अंतराळ स्थानक अर्थात स्पेस स्टेशन स्थापित करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे.
कॅबिनेटनं 2024 मध्ये चांद्रयान-4 मिशनला मंजूरी दिली होती. या मिशनचं उद्दिष्ट चंद्रावर स्पेसक्राफ्ट लँड करणं, चंद्राची माती, दगडांचे नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर सुरक्षितपणे आणणे आहे. यासाठी 2104 कोटी खर्च येणार आहे. या मिशनमध्ये पाच वेगवेगळी मॉड्यूल्स असतील. चांद्रयान-3 मध्ये 3 मॉड्यूल्स होते - प्रपल्शन मॉड्यूल (इंजन), लँडर आणि रोव्हर 3 मॉड्युल होते.
चांद्रयान-4 च्या स्टॅक 1 मध्ये लूनर सॅम्पल कलेक्शनसाठी एसेंडर मॉड्यूल आणि डिसेंडर मॉड्यूल असेल, तर स्टॅक 2 मध्ये थ्रस्टसाठी प्रपल्शन मॉड्यूल, सॅम्पल होल्ड करण्यासाठी ट्रान्सफर मॉड्यूल आणि सॅम्पल पृथ्वीवर आणण्यासाठी री-एंट्री मॉड्यूल असेल. दोन वेगवेगळ्या रॉकेट्सचा वापर करण्यात येईल - LVM-3 आणि PSLV.
गगनयान मिशन: 2025 मध्ये गगनयान मिशनमध्ये 3 अंतराळवीर 400 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत 3 दिवसांचा मिशन पूर्ण करण्यासाठी जातील.
भारतीय अंतराळ स्टेशन: भारताचे अंतराळ स्टेशन 2028 मध्ये लाँच होईल. यामध्ये पाच मॉड्यूल्स असतील आणि त्यासाठीचे डिझाइन पूर्ण झाली आहे.
चंद्रावर भारतीय अंतराळवीर: ISRO 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यावर काम करत आहे. सध्या, फक्त अमेरिकेचं अंतराळवीर चंद्रावर गेले आहे.
वीनस ऑर्बिटर मिशन: 2028 मध्ये वीनस ऑर्बिटर मिशन लाँच होईल, ज्याचा उद्दिष्ट शुक्र ग्रहाचं वातावरण आणि सूर्याचा प्रभाव किती असतो त्याची अधिक माहिती मिळवणे आहे. यासाठी 1,236 कोटी रुपयांचा बजेट ठेवला आहे.