Pahalgam Terror Attack: काश्मीरचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पुन्हा चर्चेत आले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांवरच्या कारवाईबाबत फारुख अब्दुल्ला यांनी विधान केले आहेत. दहशतवाद्यांची घरे पाडण्याची कारवाई चुकीची असल्याचं फारुख अब्दुल्ल यांनी म्हटले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या या विधानामुळं पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारतानेही पाकिस्तानाविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. पाकिस्तानसोबतचा सिंधु पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. तर, काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घरावरदेखील कारवाई करण्यात आली होती. याबाबतही फारूख अब्दुल्ला यांनी मत व्यक्त केलं आहे.
हशतवाद्यांची घरं उडवणं चुकीचं आहे, असं फारुक अब्दुल्लांनी म्हटलंय. ही वेळ सर्जिकल स्ट्राइकची नसून निर्णय घेण्याची आहे असा सल्ला त्यांनी दिलाय.. पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणं चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.दहशतवाद्यांच्या वडिलांचा काय दोष? सीमेवर सैन्य का कमी करण्यात आले? पाकिस्तानींना परत पाठवणे योग्य नाही. 'पाकिस्तानवर हल्ला कधी करायचा हे दिल्लीने ठरवावे' ही वेळ स्ट्राइक ची नाही तर निर्णय घेण्याची आहे, असंही फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
सिंधु कराराबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे, या करारात बऱ्याच काळापासून सुधारणा करणे गरजेचे होते. आपल्या नद्यांच्या पाण्यापासून आपण वंचित आहोत. नद्यांवर जलविद्युत निर्मितीच्या मदतीने हजारो मेगावॅट वीज निर्मिती करता येते. पण पाकिस्तानच्या परवानगीशिवाय हे करता येत नाही. जम्मूला चिनाब नदीचे पाणी मिळू शकत नाही कारण करारात तसे नियम आहेत. भारत हा महात्मा गांधींचा देश आहे. आम्ही पाण्यासंदर्भात पाकिस्तानला निश्चितपणे धमकी दिली आहे. पण त्यांना मारणार नाही. आपण एवढे क्रूर नाही. जेव्हा दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी करार झाला तेव्हा जम्मू-काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळं आजही लोकांना त्रास सहन करावा लागतो, असं त्यांनी म्हटलं आहे.