Marathi News> भारत
Advertisement

सरकारी आदेशानंतर जम्मू काश्मीरमधील तब्बल 48 पर्यटनस्थळं बंद; तिथं जाणं झाल्यास आता फिरायचं कुठे?

Jammu Kashmir Tourist Destinations : सरकारच्या निर्णयानंतर आता पुढे काय? काश्मीरला जायचा बेत झालाय पण, दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती पाहून धडकी भरतेय?  

सरकारी आदेशानंतर जम्मू काश्मीरमधील तब्बल 48 पर्यटनस्थळं बंद; तिथं जाणं झाल्यास आता फिरायचं कुठे?

Jammu Kashmir Tourist Destinations : पर्यटकांची प्रचंड पसंती असणाऱ्या आणि भारतातील नंदनवर अशी ओळख असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या वातावरणाला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं गालबोट लावलं. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 निष्पापांचा बळी गेला आणि प्रशासनानंही परिस्थितीचं गांभीर्य पाहता काश्मीरमध्ये काही निर्बंध लागू केले.

एकिकडून केंद्र शासनाकडून पाकिस्तानच्या या कुरापतींना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाकडूनही सावधगिरीची पावलं उचलण्यात येत आहेत. याच कारणास्तव येथील 87 पैकी आतापर्यंत एकूण 48 पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. याआधी काश्मीरमधील सर्व ट्रेक बंद करण्याचा निर्णय येथील वनविभागानं घेतला होता. 

काश्मीरमध्ये जाणार असाल तर हिरमोड होण्याची शक्यता

सुट्ट्यांच्या या दिवसांमध्ये अनेकांनीच काश्मीरच्या सफरीला पर्याय निवडला असेल. पण, इथं झालेल्या हल्ल्यानंतरही ज्यांना या ठिकाणी यायचंय त्यांचा मात्र इथं पोहोचताच हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण, काही ठिकाणी त्यांना पोहोचताच येणार नाहीय. 

कोणत्या ठिकाणी प्रवेशबंदी? 

जम्मू काश्मीरमध्ये प्रवेशबंदी असणाऱ्या ठिकाणांमध्ये योउसमर्ग, तौसीमैदान, दूडपथरी, अहरबल, कौसरंग, बंगस व्हॅली, वुलर/ वातलब, रामपोरा/ राजपोरा ,मुंडीज-हमाम-मारकूत धबधबा, खम्पू, बोस्निया, विजटॉप, सूर्यमंदिर, वेरिनाग गार्डन, सिंथन टॉप, मार्गनटॉप, अकड पार्क, हब्बा खातून पॉईंट, बाबरेशी, रिंगवाली, गोगलदरा, श्रुंज वॉटरफॉल, कामनापोस्ट,नांबलान वॉटरफॉल, इको पार्क खादनियार, संगरवानी, जामिया मस्जिद, फॉरेस्ट हिल कॉटेज, इको विलेज रिसॉर्ट (दरा), अस्तनमर्ग व्यू पॉईंट, मामनेथ/ महादेव हिल्स, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, दाचिगम, फिशरिज फार्म, अस्नपोरा, हुंग पार्क, नरांग या ठिकाणांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : ऐन उन्हाळ्यात तरुणाईचा हिरमोड; जम्मू काश्मीर सरकारचा मोठा निर्णय

 

काश्मीरमधील उर्वरित पर्यटनस्थळांवर पुरेशी सुरक्षाव्स्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीनगरच्या दिशेनं अद्यापही पर्यटक येत असले तरीही त्यांच्या संख्येत मात्र लक्षणीय घट झाली आहे. शस्त्रसंधीचं वारंवार होणारं उल्लंघन, काश्मीरमध्ये सुरू असणारं लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन या आणि अशा अनेक कारणांमुळे अद्यापही काहींनी परिस्थिती सुधारेपर्यंत इथं न जाण्याचा पर्याय निवडला आहे. तर, जी मंडळी इथं येत आहेत त्यांना काही ठिकाणांवर प्रवेश नाकारण्यात येत आही ही वस्तूस्थिती.  

Read More