Marathi News> भारत
Advertisement

कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?

त्रिवेणीच्या संगमावर न दिसणारी नदी कोठेही अस्तित्वात नाही आणि ती केवळ एक पौराणिक संकल्पना  असल्याचा दावा केला जातो. मात्र, पौराणिकदृष्ट्या ही नदीला विशेष महत्व आहे. या नदीच्या काठावर ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र होते असे म्हणतात. 

कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य! त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय?

Sarasvati River Facts : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अर्थात कुंभमेळा प्रयागराजमध्ये सुरु आहे. कुंभमेळ्यात  महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते, अशी अख्यायिका आहे. यामुळेच कुंभमेळ्यात सहभागी होणारे त्रिवेणी संगमात डुबकी मारतात. कुंभमेळ्यात पृथ्वीवरील सर्वात मोठं रहस्य पहायला मिळते. हे रहस्य आहे ते त्रिमेणी संगमाचे.   प्रयागमध्ये त्रिवेणीचा संगम होतो. त्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संमग. त्रिवेणीजवळ 3 नद्यांचा संगम होतो पण दिसतात फक्त दोनच नद्या? तिसऱ्या नदीचे गूढ काय? जाणून घेऊया. 

प्रयागमध्ये  गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. प्रयाग येथे गंगा आणि यमुना यांचा संगम सर्वांना दिसतो. पण सरस्वती (Sarasvati River Fact’s) नदीचे प्रत्यक्षात अस्तित्व दिसून येत नाही. सरस्वती नदी अदृश्यपणे वाहत प्रयागला पोहोचते आणि इथे आल्यावर गंगा आणि यमुनेचा त्रिवेणी संगम होतो असा दावा केला जातो. संशोधकांना सरस्वती नदीच्या अस्तित्वाबाबत जे पुरावे सापडले आहेत ते अचंबित करणारे आहेत. 

हे देखील वाचा...कुंभमेळ्यात बाबा कालपुरुष यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी; कावळ्यांचे वर्तन आणि नद्यांची हालचाल 

पुराणात गंगा, यमुना, सरस्वती नदीचा उल्लेख होतो. गंगा आणि यमुना नद्या अस्तित्वात आहेत. सरस्वती नदीचा कुठंही अस्तित्व सापडत नाही. सरस्वती नदीचा उगम उत्तरांचलच्या रुपण ग्लेशिअरमध्ये होत होता. तिथून ही नदी हरियाणा राजस्थानातून वाहत होती. कालांतरानं झालेल्या भूगर्भीय बदलांमुळं नदी राजस्थानात लुप्त झाल्याची कथा आहे. सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक अंगानं कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.

सरस्वती नदी बाबतचे वैज्ञानिक सत्य

सरस्वती नदीचा इतिहास 5500 वर्ष जुना आहे. सरस्वती नदी भारतीय उपखंडाच्या उत्तर-पश्चिम भागातून वाहायची. हिमालयात  सरस्वती नदीचा उगम झाला.   पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधून पश्चिमेला सिंधू नदी आणि पूर्वेला गंगा नदीच्या दरम्यान ही नदी वाहत गेली.  शेवटी कच्छच्या आखातात अरबी समुद्रात ही नदी विलीन झाल्याचा दावा काही संशोधक करतात.सरस्वती नदीचा उगम आणि तिच्या गायब होण्याच्या संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास केला आहे. यावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

एकेकाळी वायव्य भारत आणि पाकिस्तानमधून वाहणाऱ्या या नदीचे वास्तविक पुरावे भूवैज्ञानिकांना मिळाले आहेत.  होलोसीन युग (गेली 11,700 वर्षे) दरम्यान ही नदी अस्तित्वात होते. 28,000 वर्षापूर्वी ही नदी अस्तित्वात होती. पृथ्वीच्या अंतर्भागाच्या रचनेत झालेल्या बदलामुळे सरस्वती भूगर्भात नष्ट झाल्याचा दावा केला जातो. 

Read More