India Pakistan War Live Updates on 10 May 2025: भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या भूभागांवर हवाई हल्ले करत आहे. 7 मे रोजी भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. याच युद्धजन्य परिस्थितीसंदर्भातील सर्व भारत पाकिस्तान युद्धाचे लाईव्ह अपडेट जाणून घ्या एकाच ठिकाणी...
भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र पाकिस्तानकडून अवघ्या काही तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं . पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असताना राजस्थानच्या जैसलमेर भागात पाकिस्तानकडून 5 स्फोट झाल्याची माहिती मिळतेय.
भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र पाकिस्तानकडून अवघ्या काही तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी 'पाकिस्तानने युद्धविरामाचा भंग केला असून भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे. हे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत आणि यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्तहस्त देण्यात आला आहे', असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र अवघ्या काही तासात पाकिस्तानने या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून भारतातील सीमाभागात आणि अनेक ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत होती. भारताच्या पररराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तसेच पाकिस्तानचे केलेल्या हल्ल्यांना भारताने प्रतिउत्तर दिले असून हे हल्ले करतवून लावण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र अवघ्या काही तासात पाकिस्तानने या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून भारतातील सीमाभागात आणि अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. यासोबतच गोळीबार केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. असे असतानाच आता भारताच्या पररराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे.
पाकिस्तानने भारताविरुद्ध शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर पाकच्या कुरापतींना चीननं खुलं समर्थन दिलं आहे. आम्ही पाकिस्तान सोबत असल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे. भारतातील जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर, राजस्थान, कच्छ इत्यादी भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे हल्ले भारताने परतवून लावले आहेत.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता भारत आणि पाकिस्तान सरकारकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली होती. दोन्ही देशांकडून भारत पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली होती. मात्र पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून श्रीनगरच्या बदामी भागात पाकिस्तानचे १०० पेक्षा जास्त ड्रोन दिसले आहेत. भारतीय सैन्याला त्यातील अनेक ड्रोन पाडण्यात यश आले. यासोबतच कच्छ भागात सुद्धा 8 ते 10 ड्रोन दिसले असून सरक्रीकमध्ये 4 ड्रोन, 1 ड्रोन हरामी नाला तर 1 ड्रोन खावड़ा मध्ये दिसला आहे.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता भारत आणि पाकिस्तान सरकारकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली होती. दोन्ही देशांकडून भारत पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली होती. मात्र पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला आहे. श्रीनगरच्या सेना मुख्यालयाजवळ पाकिस्तानचे 4 ड्रोन भारताकडून नष्ट करण्यात आले. तसेच पठानकोट, गुरदासपुर, होशियारपुर इत्यादी ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलं आहे. अमृतसर एअरपोर्टजवळ ड्रोन दिसून आल्याने ब्लॅकआउटचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता भारत आणि पाकिस्तान सरकारकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली होती. दोन्ही देशांकडून भारत पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली होती. मात्र जम्मू, श्रीनगर भागात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला आहे.पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न देखील झाला असून उधमपूर आणि जम्मू परिसरात पुन्हा ड्रोन हल्ले झाले. भारताला अनेक ड्रोन पाडण्यात यश आले आहेत. श्रीनगरमध्ये प्रचंड स्फोटाचा आवाज झाला, आकाशात काही प्रकाशझोत दिसले.
शनिवारी सायंकाळी 5 वाजता भारत आणि पाकिस्तान सरकारकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली होती. दोन्ही देशांकडून भारत पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली होती. मात्र जम्मू, श्रीनगर भागात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला आहे.
India Pakistan War Updates : पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् अखेर शस्त्रसंधी; 22 एप्रिल ते 10 मे...; 19 दिवसात नेमकं काय काय घडलं? पाहा Timeline#indiavspakistan #IndianArmy https://t.co/XBNcHDpZV5
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम, सामान्यांना पडलेला प्रश्न 'शस्त्रसंधी' म्हणजे काय?https://t.co/4Us2DmZVZM#IndiaPakistanConflict #ceasefire #INDPAKCeasefire #WhatisCeasefire #CeasefireMeaning
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
मुंबईतील काँग्रेसचे आमदार आणि खासदार देणार सैनिक फंडाला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली असून आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल आणि आमदार ज्योती गायकवाड इत्यादी एका महिन्याचा पगार सैनिक फंडाला देणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनेने केलेल्या कामगिरीसाठी मुंबईतील लोकप्रतिनिधींचा हा निर्णय घेतलाय.
भारत आणि पाकिस्तान सरकारकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसने ट्विट करून, 'अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली आहे'.
भारत आणि पाकिस्तान सरकारकडून युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसने ट्विट करून, 'अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली आहे'.
मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपलं, 'पण 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा...'#IndianArmy #IndianPakistanTensions https://t.co/Jq0bWp49lY
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत म्हटले की, ' भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील'.
भारत सरकारच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांनी थेट चर्चा केली. पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी फोन केला, त्यानंतर चर्चा झाली आणि शस्त्रसंधीचा निर्णय झाला. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही'.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ट्विट करत भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. ट्रम्पने लिहिले की, 'अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!'.
ऑपरेशन सिंदूर नाव का ठेवलं? प्रश्न विचारणाऱ्या अँकरला शशी थरुर यांनी दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाले 'रक्ताच्या रंगाचा...'https://t.co/7E9Wfcz5kY#IndiaPakistanWar #IndiaPakistanConflict #PahalgamTerroristAttack #IndianArmy #OperationSindoor #OperationSindoor2 #ShashiTharoor
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
ऑपरेशन सिंदूर नाव का ठेवलं? प्रश्न विचारणाऱ्या अँकरला शशी थरुर यांनी दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाले 'रक्ताच्या रंगाचा...'https://t.co/7E9Wfcz5kY#IndiaPakistanWar #IndiaPakistanConflict #PahalgamTerroristAttack #IndianArmy #OperationSindoor #OperationSindoor2 #ShashiTharoor
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणं तरुणाला पडलं महागात, पोलिसांनी घडवली जन्माची अद्दलhttps://t.co/5xzCjcuhLF#IndiaPakistanWar #IndiaPakistanConflict #PahalgamTerroristAttack #IndianArmy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
भारत - पाकिस्तान तणावाच्या पाश्ववभूमीवर 11 मे 2025 ते 09 जून 2025 या कालावधीत बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही व्यक्तीने कोणतेही फटाके/फटाके वाजवू नयेत. तसेच रॉकेट उडवू नयेत असे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
'या' राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी रेल्वे धावणार नाही; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Indian Railway चा मोठा निर्णय!#IndiaPakistanWar #IndianArmy #railway https://t.co/O4bpjmU9di
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
मोठी बातमी!'भविष्यात कोणतेही दहशतवादी कृत्य हे...'; भारत सरकारची परखड भूमिका#IndiaPakistanWar #TerroristAttack https://t.co/DSntbHep9t
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
भारत सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे की, आता पुढील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध म्हणून मानला जाईल, आणि त्यानुसार भारत ठोस प्रत्युत्तर देईल.
जामनगरमध्ये सायरन वाजल्यानंतर लोकांना घराबाहेर न निघण्याचं आवाहन दिलं आहे. कंडला बंदराचं कामकाज बंद. बनासकांठामधील मोबाईल टॉवरल झाकण्यात आलं. कच्छमध्ये आज ब्लॅकआऊट होणार आहे.
+92 च्या नंबर वरून व्हाट्सअँप वर 4 वेळा ऑडिओ कॉल आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की +92 नं फोन नंबरची सुरुवात कोणत्या देशाची आहे तर ही सुरुवात पाकिस्तानची आहे. व्हेरिटो कंपनीच्या कर्मचाऱ्याला आला धमकाचा फोन आला. नांदगाव पेठच्या कंपनीतील कर्मचारी आणि कारखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.
त्यानंतर घाबरेल्या कर्मचाऱ्यांची नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. घटनेचा तपास सुरु असून त्यांनी लगेचच केंद्रीय गृह मंत्रालयालाही दिली तात्काळ माहिती दिली. अमरावती शहर आणि ग्रामीण पोलीस हायअलर्टवर आहे. अमरावती पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या अनोळखी नंबर वरून फोन आल्यास न उचलण्याचा सूचना अफवा वर विश्वास ठेवू नये.
अमरावती शहर पोलिसांची सोशल मीडिया अकाऊंटवर करडी नजर आहे.
BCCI ने अधिकृतरीत्या IPL2025 ला आठवड्यासाठी रद्द केले आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की "IPL 2025 पूर्णपणे रद्द झाले का?" आणि "पुढच्या आठवड्यात IPL पुन्हा सुरू होईल का?" https://t.co/Pa1kYMfW1A #IPL2025 #IPL #BCCI #sports #IndiaPakistanWar
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
सरकारने सर्व माध्यम वाहिन्यांना त्यांच्या प्रसारणात सायरनचा आवाज वापरू नये असे निर्देश दिले आहेत.
पाकिस्तान आणि भारतामधील वाढता तणाव लक्षात घेता देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला देखील असाच अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच जायकवाडी धरणावर येणाऱ्या पर्यटकांना चार दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. सोबतच रविवारी शहरात मॉक ड्रिल देखील होणार आहे.
चीनने संयम बाळगण्याचे आणि तणाव वाढवू नये असे आवाहन केले आहे. "आम्ही भारत आणि पाकिस्तान दोघांनाही शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याचे, शांतता आणि संयम राखण्याचे, शांततापूर्ण मार्गाने राजकीय तोडग्याच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करतो. तणाव आणखी वाढवू शकेल अशा कृती टाळण्याचे आवाहन करतो," असं चीनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कच्छमध्ये 6 पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले आहेत.
रोहित पाठोपाठ विराट कोहलीही निवृत्तीच्या तयारीत; मात्र BCCI कडूनच होतोय विरोधhttps://t.co/LFYCMUjYUO #ViratKohli #ViratKohliretirement #BCCI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
पाकिस्तान जाणूनबुजून भारतीय संरक्षण स्थळांना लक्ष्य करत आहे. भारतातील S-400 आणि इतर उच्च मूल्य लक्ष्ये (HVT) नष्ट करण्याच्या खोट्या कथा पाकिस्तान पसरवत आहे. पाकिस्तानने जड तोफखाना आणि मोर्टारचा वापर करून हल्ले केले. भारतानेही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले. भारताला हे करायचे नाही, परंतु पाकिस्तान आम्हाला असे करण्यास भाग पाडत आहे. आम्ही अपेक्षा करतो की पाकिस्तानही त्याच प्रकारे वागेल, अशी अपेक्षा लेफ्टनंट सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
पाकिस्तान लष्कराने भारताच्या पश्चिमेकडील भागावर हल्ला केला. श्रीनगर ते नलियादरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि एलओसीवर विशेषतः हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानने लांब पल्ल्याची शस्त्रे, ड्रोन आणि स्वार्म्सचा वापर केला. पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे 1 वाजून 40 मिनिटांनी वाजता पाकिस्तानने उच्च वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र वापरून पंजाबमधील एअर बेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान मुद्दाम भारतीय संरक्षण स्थळांना लक्ष्य करत आहे, असं लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या कारवायांनी परिस्थितीला भडकली आणि तणाव वाढवला आहे. आम्ही त्याला प्रत्युत्तर देत आहोत, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.
> रावळपिंडीमधील नूर खान हवाई तळ
> शोरीकोटमधील पाकिस्तानी हवाई दलाचा रफीक हवाई तळ
> चकवालमधील पाकिस्तानी हवाई दलाचा मुरीद हवाई तळ
> पाकिस्तानातील दक्षिण पंजाबमधील राहीम्यार खान हवाई तळ
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना फोन केल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा झाली आहे. दोन्ही देशातील संघर्ष टाळण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
इस्लामाबादमधील सर्व पेट्रोल पंप बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवस हे आदेश लागू असतील असं या पत्रकात म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने जम्मूजवळील पाकिस्तानच्या पोस्ट आणि दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले आहेत. हे ठिकाण भारतावर ट्युब-लाँच ड्रोन हल्ल्यासाठी वापरले जात होते.
भारतीय लष्कराने जम्मूजवळील पाकिस्तानच्या पोस्ट आणि दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले आहेत. हे ठिकाण भारतावर ट्युब-लाँच ड्रोन हल्ल्यासाठी वापरले जात होते.https://t.co/6RsYevjiZA < येथे वाचा लाइव्ह अपडेट्स...#Indvspak #IndiaPakistanWar #indiapakistan #indianarmy #OprationSindoor pic.twitter.com/Z122Y64x6r
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 10, 2025
Operation Sindoor Live Updates: जम्मू-कश्मीरमधील अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राजौरीत पाकिस्तानी गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार ठप्पा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
> पाकिस्तानकडून 'ऑपरेशन बुन्यानुन मारसूस'अंतर्गत भारतावर फतेह मालिका बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर भारताने या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
> भारताने प्रत्युत्तरादाखल रावळपिंडीसह पाकिस्तानमधील प्रमुख हवाई तळांवर हल्ले केले.
> भारतीय वायुदलाची सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याची माहिती.
> पाकिस्तानकडून 'ऑपरेशन बुन्यानुन मारसूस'अंतर्गत भारतावर फतेह मालिका बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आलं.
> पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या फॉरवर्ड बेस आणि शहरांवर फतेह मालिका बॅलिस्टिक मिसाईल्स डागले.
> ही कारवाई भारताविरोधातील पाकिस्तानची मोठी वाढती आक्रमकता दर्शवते.
पाकिस्तानने भारताविरुद्ध 'ऑपरेशन बुनियान उल मारसूस' सुरू केल्याची केली घोषणा केली. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. पाकिस्तानचे सगळे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात भारताला यश आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. पाकिस्तानविरोधी रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानकडून रात्री भारताच्या 26 ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न. पण हे सगळे प्रयत्न भारताने परतवून लावल्याची सूत्रांची माहिती.
भारतीय सैन्य दलाची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. साऊथ ब्लॉकमध्ये भारतीय सैन्य दलाची ब्रीफिंग होईल. दहशतवादविरोधी कारवायांबाबत महत्वपूर्ण माहिती दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.