Pahalgam Terrorist Attack : सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याची. या हल्ल्यात कोणी वडील गमावले, कोणी नवरा गमावला, कोणी भाऊ गमावला तर कोणी मुलगा गमावला. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याला कोणी कधीच विसरू शकणार नाही. या सगळ्या घटनेवर आता संगीतकार आणि स्क्रिप्ट राइटर मनोज मुंतशिर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मनोज मुंतशिर यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं की मला हा व्हिडीओ कधी बनवायचा नव्हता.
मनोज मुंतशिर यांनी त्यांनी हा व्हिडीओ त्याच्या X अर्थात आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. मनोज मुंतशिर यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की या समस्येचं मूळ फक्त दहशतवाद नाही तर पाकिस्तानी सेना देखील आहे. त्यानंतर त्यांनी समस्त देशबांधवांच्या दु:खात त्यांच्यासोबत असल्याचं म्हणतं खोचक टीका केली की 'मुस्लीम आहेस, तर कलमा वाचून दाखव, येत नाही, हिंदू आहेस...' त्यानंतर बॅकग्राऊंडला गोळ्यांचा आवाज येतो.
ये वीडियो मैं कभी नहीं बनाना चाहता था!#PahalgamTerroristAttack #pahalgamattack pic.twitter.com/wtxsrvKFzk
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) April 23, 2025
व्हिडीओची सुरुवात झाल्यानंतर मनोज म्हणाले, "या गोष्टींचा आनंद साजरा करा की ही गोळी तुमच्या कोणत्या जवळच्या व्यक्तीला लागली नाही. पहलगाममध्ये तुमचा मुलाची किंवा भावाची हत्या झाली नाही. पण किती दिवस वाचणार? काश्मीरला नाही गेलात, तरी मुर्शिदाबादमध्ये मारले जाल, कोलकतात मारले जाल, गोधरामध्ये मारले जाल, दिल्ली-मुजफ्फरनगरमध्ये मारले जाल. जर तुम्ही ठरवलंय की तुम्ही वाघ नाही, शेळी आहात. तर मग अशा प्रकारे तुमचा जीव जाण्यासाठी तयार राहा... तुमचा नंबर यायला वेळ लागणार नाही."
हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack : व्हायरल व्हिडीओत दिसणारी व्यक्ती शहीद विनय नरवाल नाही; मग कोण? सत्य समोर
मनोज पुढे म्हणाले, "तुम्ही 'हर हर महादेव' म्हणून एकत्र येऊ शकत नाही, मग 'अल्लाह हू अकबर' म्हणून गुडघे टेका. कलमा शिकून घ्या, किमान जीव तरी वाचेल. हे ऐकून त्रास होतोय ना? आता तुम्हाला मला शिव्या द्याव्याशा वाटतायत ना? पण जर या हातांनी कमेंट करत शिव्या देण्याऐवजी, तुमचं मन आणि हात देशासाठी झटले असते, तर त्या 25 निरपराध हिंदूंचा जीव गेला नसता आणि खरी अडचण हीच आहे की तुम्ही अजूनही हे समजून घ्यायला तयार नाही. मी जर म्हणालो की हिंदू धोक्यात आहे, तर तुम्ही म्हणाल हा RSSवाला आहे, संघी आहे. जर मी म्हणालो की वेगळे राहिलात तर संपाल तर तुम्ही म्हणाला, – हा BJP चा चमचा आहे. मी म्हणतो, औरंगजेबाचं इस्लाम चालणार नाही, तर तुम्ही म्हणाल आम्ही तर सेक्युलर आहोत. तुम्हाला तर दरग्यांवर चादर चढवावी लागते, तेव्हा कुठे समाधान मिळतं. हे गंगा-जमुनाच्या एकतेचं कार्ड सगळीकडे दाखवून फिरता, मग पहलगाममध्ये का नाही दाखवलंत? गळाभेट का घेतली नाही?"
पुढे ते म्हणाले की "हे सांगायलाच जाऊ नका की आतंकवादाचा कोणता धर्म नसतो. हे इन्स्टाग्रामवर काही रील्स पाहून लिबरल विचार करायला लागतात. ना तुमच्यात, माझ्या नजरेत त्याची किंमत ही 2 टक्के आहे. संतोष जगदाळेला आतापर्यंत तुम्ही ओळखत असाल, त्यांचं कुटुंब हे जीव वाचवण्यासाठी एका टेंटमध्ये लपले होते. संतोष हे कलमा वाचू शकले नाही तर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. कर्नाटकाचे मंजूनाथ यांच्यावर त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. पल्लवी यांनी म्हटलं की माझ्या नवऱ्याची हत्या केली माझी पण करा. तर त्यांना उत्तर देत सांगितलं की नाही मारणार, मोदींना जाऊन सांगा. हो आम्ही मोदींना सांगणार."
पुढे ते म्हणाले की "पंतप्रधान हे कोणत्याही देशासाठी वडिलांसारखे असतात आणि मोदीजी, तुम्ही तर 100 कोटी हिंदूंसाठी वडिलांच्या जागी आहात. तुमच्या मुलांची हत्या झाली. तुमच्या घरातील मुली विधवा झाल्या आहेत. तुमच्या दारात मृत्यूचा शोक उभा आहे. आयांनी त्यांची लेकरं गमावली. तुम्ही आमचा सूड घ्या, घ्यायलाच पाहिजे आणि यावेळी एखाद्या चकमकीत चार गांडुळांना मारले, म्हणजे सूड पूर्ण झालाय असं समजू नका. पाकिस्तानी सैन्याची छाटलेली मुंडकी आम्हाला हवीत. कारण आमची समस्या फक्त दहशतवाद नाही, आमची समस्या ही पाकिस्तानची लष्कर आहे."