Khawaja Asif : पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसल्याची कबुली खुद्द पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा भांडाफोड करत चांगलंच झापलं आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणारा देश असल्याचं भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी ठणकावून सांगितलं. पाहूयात सविस्तर
पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत होता, आसिफ ख्वाजांची कबुली
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या कारनाम्यांचं बिंग स्वत:च फोडलं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत होता अशी कबुली खुद्द संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिल्याचे गंभीर परिणाम पाकिस्तान भोगत असल्याचं देखील ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नेते भारताविरोधातच गरळ ओकाताय. त्यात आता ख्वाजा आसिफ यांची देखील भर पडली आहे. भारतातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारताकडून हा सर्व ड्रामा सुरु असल्याचं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे.
भारत पाकविरोधात युद्ध करू शकतो?
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी नेते भारताला धमकी देत आहेत. हनिफ अब्बासी यांनी तर भारताला थेट अणुबॉम्बची धमकी दिली होती. दरम्यान हनिफ अब्बासी यांच्या धमकीला भारताचे निवृत्त मेजर कर्नल जी.डी बक्षीसींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचं पाकिस्तानानं वारंवार सांगितलं. मात्र, दहशतवाद्यांचा खरा पाठिराख हा पाकिस्तानच असल्याचं खुद्द त्यांच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला टक्कर देणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाच वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडून सीमारेषेवर सैन्य आणि युद्धसामग्रीची जमवाजमव करण्यात येत आहे. अशातच तुर्कीने पाकिस्तानला अत्याधुनिक युद्धसामुग्री पाठवल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तुर्कीने सी-130 या विमानातून पाकिस्तानला युद्धासाठी दारुगोळा आणि ड्रोन पुरवल्याची माहिती आहे. परंतु, तुर्कीने या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे.