Marathi News> भारत
Advertisement

Narendra Modi on Pakistan: '...तर एक दिवस पाकिस्तानच संपेल', PM नरेंद्र मोदींचा जाहीर इशारा; म्हणाले 'रक्त आणि पाणी एकत्र...'

PM Narendra Modi on Pakistan Terrorism:  पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवाद, पाकिस्तानव्याप्त काश्मीवरवरच होईल असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. तसंच रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं ठणकावून सांगितलं आहे.   

Narendra Modi on Pakistan: '...तर एक दिवस पाकिस्तानच संपेल', PM नरेंद्र मोदींचा जाहीर इशारा; म्हणाले 'रक्त आणि पाणी एकत्र...'

PM Narendra Modi on Pakistan Terrorism: पाकिस्तानी लष्कर, सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे, ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवतील असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. जर पाकिस्तानला अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवादाला संपवावं लागेल. याशिवाय शांततेचा कोणताही मार्ग नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही अशा शब्दांत मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केलं. ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच व्यक्त होत पाकिस्तानला इशारा दिला. 

'पाकिस्तानशी चर्चा झाली तर...'

"पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवाद, पाकिस्तानव्याप्त काश्मीवरवरच होईल असंही नरेंद्र मोदींनी जगाला सांगितलं आहे. शांतीचा मार्गही शक्तीतून जातो. भारतीयांनी शांततेत जगण्यासाठी, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तीशाली होणं गरज आहे. गरज लागल्यास या शक्तीचा वापरही गरजेचा आहे. मागील काही दिवसांत भारताने हेच केलं आहे".

'दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट'

"22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देश आणि जगाला बेचैन केलं होतं. सुट्टी साजरी कऱणाऱ्या निर्दोषांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांच्या समोर निर्दयीपणे मारुन टाकलं. हा दहशतवादाचा विभत्स चेहरा आहे. ही क्रूरता होती. देशाची सद्भावना तोडण्याचा प्रयत्नही होता. माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या फार मोठं दु:ख होतं. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, वर्ग, राजकीय परक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला," असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, "आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली होती. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतावादी संघटनेला आमच्या बहिणी, मुलींचा कपळावरुन सिंदूर हटवण्याचा काय परिणाम असतो हे समजलं आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे". 

'दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता'

"6 मेच्या रात्री आणि 7 मेच्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला सत्यात उतरताना पाहिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना, प्रशिक्षण केंद्रावर प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत इतका मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकत्र येतो, देश पहिला या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वपरी असतं तेव्हा असे निर्णय घेतले जातात. परिणाम दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानने दहशतवादी ठिकाणांवर भारताने हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांची इमारतीच नाही, तर धैर्यही कोसळलं आहे. बहावलपूर आणि मुरीदसारखी दहशतवादी ठिकाणं एकाप्रकारे जागतिक दहशतवादाची युनिव्हर्सिटी राहिली आहे. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत त्या सगळ्याचं कनेक्शन यांच्याशी जोडलं आहे," असंही त्यांनी म्हटलं.

'भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला'

पुढे ते म्हणाले. "भारताच्या या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं आहे. त्यांचे अनेक आका खुलेआम पाकिस्तानात फिरत होते. जे भारताविरोधात षडयंत्र रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात संपवंल आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत आहे. पाकिस्तान घाबरला आहे. आणि त्याचमुळे त्यांनी आणखी एक प्रयत्न केला. भारताच्या कारवाईचं समर्थन करण्याऐवजी भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिरं, सामन्यांची घरं यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचचा बुरखा फाटला. जगाने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल भारतासमोर कशाप्रकारे कोसळली हे पाहिलं. भारताच्या एअर डिफेन्सने आकाशतच त्यांनी नष्ट केलं. पाकिस्तानची सीमेवर वार करण्याची तयारी होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला"

'प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे'

आम्ही पाकिस्तानच्या दशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तान काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपली तिन्ही दलं, बीएसएफ सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची कारवाई आहे असंही मोदींनी सांगितलं आहे. 

'ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची निती'

"भारताने पहिल्या तीन दिवसात पाकिस्तानला इतकं उद्धवस्त केलं ज्याचा त्यांना अंदाजही नव्हता. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान वाचण्याचे रस्ते शोधत होता. पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी विनवणी करत होता. वाईट प्रकारे मार खाल्ल्यानंतर 10 मेच्या दुपारी पाकिस्तानी लष्कराने आमच्या डीजीएमओंकडे संपर्क साधला. तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. पाकिस्तानच्या मनात वसलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना खंडर केलं. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानने विनवणी केली, आमच्याकडून कोणताही दहशतवादी हालचाल किंवा लष्कर कारवाई केली जाणार नाही तेव्हा विचार केला. आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तानच्या प्रत्येक पावलावर, काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपले तिन्ही दलं, बीएसएफ, निम लष्कर सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची निती आहे," असंही मोदींनी सांगितलं आहे. 

Read More