Narendra Modi Warning to Pakistan: गुजरातच्या भुजमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. तर दुसरीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सुखाचं आयुष्य जगा, भाकरी खा. अन्यथा माझी गोळी आहेच, असा इशारा भुजमधून मोदींनी पाकिस्तानला दिला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांना धडा शिकवला. तसंच दहशतवाद्यांची तळं देखील भारतानं उद्ध्वस्त केली होती. दरम्यान यानंतर पाकिस्ताननं देखील भारतावर प्रतिहल्ला केला होता. मात्र, पाकिस्तानचे सर्व हल्ले भारतानं उधळून लावले होते.
भारताच्या ऑपरेश सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. भारतानं पाकिस्तानची एअरबेस देखील खाक केली होती. त्यानंतर पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादासह सर्व मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हे विधान केलं. आम्हाला काश्मीर प्रश्न आणि पाणी प्रश्नासह सर्व वाद चर्चेद्वारे सोडवायचे आहेत. आम्ही आमच्या शेजाऱ्यासोबत व्यापार
आणि दहशतवादविरोधी मुद्द्यांवर चर्चा करण्यास देखील तयार आहोत असं ते म्हणाले आहेत.
एकीकडे पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतासोबत चर्चा करणार असल्याचं सांगत आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या कुरघोड्या या सुरूच आहेत. बीएसएफनं 70 पेक्षा जास्त पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. लूनीमधील लष्कर-ए-तोयबाच्या लॉन्चपॅडवरही हल्ला बीएसएफनं हल्ला केला. सांबामध्ये शहीद जवानांच्या नावे चौक्या असणार आहेत.
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा पाठिराखा असल्याचं जगाला माहिती आहे. तसंच पाकिस्तान हा भारताविरोधात कुरघोड्या करणं थांबवणार नाही. हे भारतासह अख्ख्या जागाला माहिती.. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सुधरण्याचं आव्हान करत इशारा देखील दिला आहे.