विचार मांडल्यास अडचणी वाढतील...
विचार मांडल्यास अडचणी वाढतील...
R Madhavan on NCERT syllabus : मागील काही वर्षांमध्ये देशातील शैर्षणिक क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. काही बदलांचं सर्व स्तरांतून स्वागत झालं, मात्र काही बदलांनी देशातील काही वर्ग, काही राज्य दुखावली गेली ही वस्तुस्थितीसुद्धा नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्येही बदल करण्यात आला. जिथं मुघलांवर आधारिक ऐतिहासिक संदर्भ असणारे धडे वगळण्यात आले. याच निर्णयावर आणि आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अभिनेता आर माधवननं भाष्य केलं.
अभ्यासक्रम बदलांसंदर्भातील विचार मांडल्यास माढ्याच अडचणी वाढू शकतील या वस्तूस्थितीचा स्वीकार करत आर माधवननं या निर्णयावर आपले विचार मांडले. स्वानुभवाचा मुद्दा अधोरेखित करताना आपण शालेय जीवनादरम्यान इतिहासाच्या अभ्यासक्रमात मुघलस ब्रिटीश राजवट आणि स्वातंत्र्यलढ्याविषयीसुद्धा माहिती मिळवली. या साऱ्यावर साधारण 8 धडे आधारित होते. पण, दाक्षिणात्य इतिहासावर फक्त एकच धडा होता, असं सांगताना चोल साम्राज्याची राजवट जवळपास 2400 वर्षांसाठी सक्रीय असल्याची बाब त्यानं उजेडात आणली.
मुघलांच्या 800 वर्षांच्या राजवटीशी त्यानं दाक्षिणात्य राजवटीची तुलना करत कालखंड मोठा असला तरीही ब्रिटीश आणि मुघलांच्याच इतिहासाला अधिक महत्त्वं दिल्याची बाब प्रकाशात आणत नाराजी व्यक्त केली. या अभिनेत्यानं भाषेच्या मुद्द्यावरही उजेड टाकला.
तामिळ ही अतिशय पुरातन भाषा असल्याचं सांगताना ही भाषा सर्वज्ञात असून अनेकांची प्राथमिक भाषा आहे, मात्र अभ्यासक्रमात या भाषेविषयी फार माहिती देण्यात आलेली नाही, तेव्हा नेमकं काय शिकवंल जावं हे कोणी ठरवलंय? असा थेट सवाल त्यानं मांडला. हा असा (अर्धवट/ एकतर्फी) अभ्यासक्रम लागू करत संस्कृतीमागे असणारं शास्त्रीय ज्ञान मात्र दुर्लक्षित ठेवण्यात आल्याचा मुद्दा त्यानं परखडपणे मांडला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच NCERT च्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार करण्यात आला आणि इयत्ता सातवीच्या पुस्तकांमध्ये काही नव्या विषयांचा समावेश करण्यात आला. यामध्ये भारतीय राजघराणी, महाकुंभचे संदर्भ, 'मेक इन इंडिया' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' यांसारख्या सरकारी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलं. या बदलांवर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.