प्रेमानंद महाराजांना ती महिला म्हणाली की, मला माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने कुठेतरी लग्न करायचं होतं. आता मी लग्न केलं आहे, अशावेळी पूर्वीच्या अफेयरबद्दल काय... त्यामुळे घर तुटतं. महाराज, मी माझ्या पतीला माझ्या पूर्वीच्या अफेयरबद्दल सांगू का? दुसऱ्या एका प्रकरणात, जेव्हा ते सांगण्यात आले तेव्हा संपूर्ण वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालं.
यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की, 'पतीला मागील नातेसंबंधांबद्दल न सांगण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही केलेल्या चुकीबद्दल सांगू नका कारण त्यामुळे तुमच्या पतीचे तुमच्यावरील प्रेम कमी होईल. तुम्ही तुमच्या चुकीबद्दल सांगू नका आणि चुकूनही ती चूक पुन्हा होऊ देऊ नका. जर लग्नापूर्वी तुमचा एखादा मित्र असेल आणि तुम्ही चुकून चुकीचे पाऊल उचलले असेल आणि आता तुम्ही दुसऱ्याशी लग्न केलं असेल तर ते विसरून जा. जणू काही मागच्या जन्माची गोष्ट आहे, आता चूक करू नका, नाहीतर तुमचे कुटुंब, तुमचं सर्व नातेसंबंध नष्ट होतील आणि तुटतील.'
जर तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या मागील नात्यांबद्दल प्रामाणिकपणे सांगितलं तर त्याचं मन कलंकित होईल. त्याला तुमच्याबद्दल चांगली भावना राहणार नाही. प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, त्यांना वाटते की तिच्या पतीच्या प्रेमापोटी तिने तिच्या चुकीचे प्रायश्चित्त करावं आणि आता तिने चुकूनही दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडे पाहू नये.
प्रेमानंद महाराजांनी महिलांसह तरुणांनाही सावध राहण्याचा इशारा दिलाय. ते म्हणाले की, त्याचप्रमाणे पुरुषाने लग्नापूर्वी केलेली चूक लपवावी आणि लग्नानंतर आपल्या पत्नीच्या भावना मनात ठेवाव्यात. दुसऱ्या कोणाचीही पर्वा करू नका, नाहीतर...
ते म्हणाले की आजकालच्या या नवीन मुलांना सर्व काही माहित नाही आणि ते त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. पण लग्नानंतर जरी ते सुधारले तरी त्यांचे जीवन काही प्रमाणात सुधारेल. तुमच्या पतीला देव मानून, तुमच्या पत्नीला तुमचे जीवन मानून आणि सर्व चुकीचे नातेसंबंध आणि भावना सोडून देऊन, वैवाहिक जीवन सुरळीत करावे.