Atul Subhash like Suicide Case: टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एक तरुणाने लाइव्ह व्हिडीओ बनवून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. व्हिडीओमध्ये मृत मानव शर्माने आई आणि वडिलांना सॉरी म्हटले आहे. 'मी माझ्या पत्नीच्या छळाला कंटाळलो आहे. पुरुषांबद्दल काही बोलू नका.' असेही या व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे. सुमारे 7 मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. या तरुणाने पत्नी आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. व्हिडीओमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळल्याचे तरुणाने सांगितले.
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने गळफास लावून रडतानाचा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओमध्ये बोलले आहे की, कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकटे पडतात. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मानव शर्मा असे या तरुणाचे नाव आहे आणि तो सदर भागातील डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी होता. त्याने 24 फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच सीएम पोर्टलवर तक्रार पत्रही लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांची सून आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाला जबाबदार धरण्यात आले आहे.
वडिलांचे म्हणणे आहे की, 'मुलाचे लग्न 30 जानेवारी 2024 रोजी झाले होते. सून मुलासह मुंबईला शिफ्ट झाली. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद सुरु झाले. सून नेहमी कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी द्यायची.' वडिलांच्या म्हणण्यानुसार, सून तिच्या प्रियकरासोबत राहण्याबाबत नेहमी बोलायची. यामुळे त्यांच्या मुलाने सगळ्या गोष्टींना कंटाळून मृत्यूला कवटाळले. हा प्रकार घरच्यांना कळताच त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मानव शर्माने मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवला. ज्यात तो बोलताना दिसत आहे की, "माफ करा आई आणि बाबा. मी तर जाईन. पण कृपया पुरुषांचा विचार करा. त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही, बिचारे खूप एकटे पडतात. मी निघून गेल्यावर सर्व काही ठीक होईल." त्या आधीही मानवने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे मानवने सांगितले. सुमारे 7 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये तो रडताना दिसत आहे.
Disclaimer: जीवन अनमोल आहे. त्याचा पूर्ण आदर करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्या समस्येमुळे किंवा घटनेमुळे व्यथित असाल तर जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु जेव्हाही काही कारणास्तव तुम्हाला तीव्र निराशा, नैराश्य, ताण वाटेल तेव्हा सरकारने दिलेल्या ९१५२९८७८२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.