Marathi News> भारत
Advertisement

'याला घोटाळा म्हणून नका, देश सोडून पळालो नाही, मी कानपूरमध्ये आहे'

पहिली गोष्ट तर याला घोटाळा म्हणून नका आणि दुसरी गोष्ट  मी देशसोडून पळाले नाही तर कानपूरमध्येच आहे असे विक्रमने रविवारी सांगितले.

'याला घोटाळा म्हणून नका, देश सोडून पळालो नाही, मी कानपूरमध्ये आहे'

नवी दिल्ली : पहिल्यांदा ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या, पुढे नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चौकसी आणि विक्रम कोठारीही घोटाळा करुन देश सोडून फरार झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले. 

बॅंकामधून हजारो कोटी रुपयांचं कर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांच्या लिस्टमध्ये आणखी एक नाव जोडल गेलंयं. 

पेन बनवणारी रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व. त्याने देशातील ५ सरकारी बॅंकांमधून साधारण ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज न चुकवता फरार झाल्याचा आरोप आहे. पण व्यावसायिक असलेल्या विक्रम कोठरीने या वृत्ताचे खंडन केलयं.

कोण आहे विक्रम कोठारी ? 

कोठारीचा संबंध 'पान पराग'शी आहे. त्याचे वडील मनसुख भाई कोठारी गुजराती परिवाराशी संबंधित आहेत.

त्यांनी १९७३ मध्ये पान मसाल्याचा व्यवसाय सुरू करत पान पराग असे नाव दिले.१९८३ ते १९८७ दरम्यान पान पराग ही जाहिरात करणारी सर्वात मोठी कंपनी.

कोणाकडून किती कर्ज ?

कोठारी कानपुरला राहत असून तिथेच घर आणि कार्यालय आहे. त्याने ५ सरकारी बॅंकामधून ५ हजार कोटी रुपये घेतले. २०१० पासून हे कर्ज घेण्यास सुरूवात झाली..

युनियन बॅंकेच्या स्थानिक मॅनेजरनुसार, कोठारीन ५ बॅंकांतून साधारण ३ हजार कोटींचे कर्ज घेतले. याचे कर्ज मिळून २०१८ पर्यंत व्याज मिळून ५ हजार कोटी रुपये झाले. 
 
 इंडियन ओवरसीस बॅंक : १४०० कोटी 
 बॅंक ऑफ इंडिया : १३९५ कोटी 
 बॅंक ऑफ बडोदा : ६०० कोटी 
 युनियन बॅंक : ४८५ कोटी
 इलाहाबाद बॅंक : ३५२ कोटी 
 
याव्यतिरिक्त कोठारीवर ६०० कोटी रुपयांचा चेक बाऊंस प्रकरणाचीही तक्रार आहे. यामध्ये पोलिस त्याची चौकशी करतेय.

याला घोटाळा म्हणून नका 

पहिली गोष्ट तर याला घोटाळा म्हणून नका आणि मी देशसोडून पळाले नाही तर कानपूरमध्येच आहे असे विक्रमने रविवारी सांगितले.

बॅंकेने माझ्या कंपनीला बॅंकेतर्फे नॉन परफॉर्मर ठरविण्यात आले, डिफॉल्टर नाही.

बॅंकेतून घेतलेल्या कर्जाचे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे आहे. मी कर्ज घेतलय आणि लवकरच ते फेडणार आहे, असेही त्याने सांगितले. 

Read More