Marathi News> भारत
Advertisement

140000000000 रुपयांची वसुली...म्हणून किंगफिशर कंपनी बंद पडली; मद्य सम्राट विजय माल्याचा खळबळजनक खुलासा


140000000000 रुपयांची वसुली केल्यानंतर किती पैसा उरलाय ? 9 वर्षांनंतर विजय माल्याने केले खळबळजनक खुलासे केले आहेत. 

 140000000000 रुपयांची वसुली...म्हणून किंगफिशर कंपनी बंद पडली; मद्य सम्राट विजय माल्याचा खळबळजनक खुलासा

Vijay Mallya Interview:  भारतातील 17 बँकांमधून हजारो कोटींचे कर्ज घेऊन लंडनला पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याने 9 वर्षांनंतर आपले मौन सोडले आहे. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या 4 तासांच्या मुलाखतीत मल्ल्याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 6200 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात सरकाने 14000 कोटींची वसुली केल्याचा आरोप विजय माल्याने केला आहे. 

 'फ्लाय द गुड टाईम्स' आणि 'द टेस्ट ऑफ रिअल इंडिया' सारख्या टॅगलाइनसह व्यवसायाच्या शिखरावर पोहोचलेले विजय मल्ल्या बिजनेस टायकून म्हणून जन्मााला आले तरी त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागले. यासाठी 400 रुपयाच्या पगाराची नोकरी केली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना किंगफिशर बियर बनवणारी कंपनी युनायटेड ब्रुअराइज ग्रुपची जबाबदारी मिळाली.  
विजय मल्ल्या यांची कंपनी युनायटेड बेव्हरेजेस ही सर्वात मोठी एअरलाइन कंपनी आहे. यूबी ग्रुपची जबाबदारी घेतल्यानंतर, मल्ल्याने केलेल्या मार्केटिंगमुळे विक्री वाढली आणि किंगफिशर बिअरचे 52% मार्केट शेअर मिळवले. 2005 मध्ये  मुलगा सिद्धार्थच्या 18 व्या वाढदिवशी किंगफिशर एअरलाइन्स सुरू केली. किंगफिशरला प्रीमियम फ्लाइंग अनुभव देण्यासाठी सुरुवात करण्यात आली.

2008  पर्यंत ती भारतातील सर्वात मोठी एअरलाइन बनली, परंतु नंतर वाईट दिवस सुरू झाले. मल्ल्या यांनी किंगफिशरच्या पडझडीसाठी सरकारी धोरणांना जबाबदार धरले. मल्ल्या यांनी पॉडकास्टमध्ये सांगितले की त्यांनी किंगफिशरच्या आर्थिक संकटाबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि मदत मागितली. परंतु त्यांना सरकारी मदत मिळाली नाही. मल्ल्या यांनी सांगितले की विमान इंधनाच्या (एटीएफ) वाढत्या किमती आणि राज्य सरकारांनी लावलेल्या मोठ्या विक्री करामुळे एअरलाइनचा खर्च वाढला. सरकारने परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली नाही, ज्यामुळे किंगफिशर एअरलाइन्स बंद झाली.   

मी देश सोडून पळून गेलो नाही. लंडनला जात असल्याचे सरकारला सांगितले होते. पण पासपोर्ट रद्द झाल्यामुळे तो तिथेच अडकलो. डेट रिकव्हरी ट्रिब्यूनल (DRT) च्या प्रमाणपत्रानुसार व्यासहित 6,203 कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, सरकार  9,000 कोटी रुपये म्हणत  मालमत्तेचा लिलाव करून 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात केली. सरकारने कोणती मालमत्ता विकली? मला काहीच माहिती नाही असं मल्ल्याने मुलाखतीत म्हटले आहे. 

2021 मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथील किंगफिशर हाऊसचा 52.55 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला.  गोव्यात असलेला हा आलिशान व्हिला देखील 73  कोटी रुपयांना विकला गेला आहे. 14000 कोटींची संपत्ती हातची जाऊनही मालल्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. मल्ल्या लंडनमधील त्याच्या आलिशान बंगल्यात राहतो.  इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेत मालमत्ता असल्याचे मल्ल्याने स्वतः पॉडकास्टमध्ये सांगितले आहे. 

विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या यांचे गेल्या वर्षी लग्न झाले. तो आपल्या पत्नीसह लंडनमध्ये राहतो. सिद्धार्थ मालल्या मॉडेल आणि अभिनेता म्हणून काम करातो. सिद्धार्थ माल्ल्या अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम करतो. सिद्धार्थ मल्ल्याकडे 380 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता आहे, त्याच्या वडिलांच्या व्यवसायाव्यतिरिक्त, तो मनोरंजन आणि मॉडेलिंगमधून देखील कमाई करत आहे.  मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या लंडनमध्ये राहतो, तर विजय मल्ल्याला तीन मुली लियाना, तान्या आणि लैला या विवाहित आहेत. 

 

Read More