Marathi News> भारत
Advertisement

मुघल राजाच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांचं काय व्हायचं? जोधाबाई, नूरजहाँ अन् मुमताज...

Mughal Emperor : मुघल राजांच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांचं काय व्हायचं जाणून घ्या...

मुघल राजाच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांचं काय व्हायचं? जोधाबाई, नूरजहाँ अन् मुमताज...

Mughal Emperor : मुघलकाळाविषयी आपण अनेकदा ऐकतो. पण हा काळ कधी सुरु झाला आणि संपला याविषयी जास्त कोणाला माहित नाही आहे. तर हा काळ 1526 मध्ये सुरु झाला असून 1857 पर्यंत होता. हा काळ भारताच्या इतिहासात एक वेगळी संस्कृती एक वेगळी कला घेऊन आला. या काळात मुघल सम्राट हे त्यांची संस्कृती, कला आणि शानस करण्याची एक वेगळी व्यवस्था या साठी ओखळले जातात. मुघल राण्या देखील या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पण त्यांची स्थिती आणि राजाच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य कसं असेल सामाजिक आणि राजकारणी परिस्थितींवर निर्भर आहे. 

मुघल बादशाह आणि राणी हे त्यांच्या शाही जीवणासाठी ओळखले जातात. त्यांचे महाल हे आलीशान होते आणि सोने-चांदीची भांडी, रेशमी कपडे आणि दागिण्यांचा ते वापर करायचे. या सगळ्या राण्यां हरममध्ये रहायच्या. हरममध्ये राण्या त्यांची दासी आणि कुटुंबातील इतर महिला एकत्र रहायच्या. हरमच्या सुरक्षेसाठी काही खास सैनिक आणि ख्वाजासराए (नपुसकलिंग सेवक) होतेय.

मुघल बादशाह हे अनेकदा लग्न करायचे. ते फक्त मुघल मुलींशीच लग्न करत नव्हते तर राजपूत, पारसी, तुर्की राजकुमारी देखील आहेत ज्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. हे विवाह बहुतेकदा राजकीय युतींसाठी होते. मुघल राज्यांच्या निधनानंतर राण्यां शाही दरबारातून आर्थिक मदत मिळायची. अनेक राण्या या राज्याच्या निधनानंतर हरममध्ये राहायच्या. त्यांना सन्मान देण्यात यायचा त्यात राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि दासी देखील दिल्या जातात. या राण्यांना पेन्शन आणि इतर सुविधा देखील दिल्या जातात जेणे करून त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जाणार नाहीत. 

मुघल राण्या या सर्वसाधारणपणे पुन्हा लग्न करायच्या नाही. त्या विधवा म्हणून हरममध्ये राहायच्या आणि धार्मिक कार्य अर्थात मस्जिद आणि मकबरे बनवण्यात वेळ घालवायच्या. त्यांना पेन्शन आणि इतर सुविधा दिल्या जातात. त्यानंतर राण्या या संतांच्या संपर्कात येतात किंवा तिर्थयात्रेवर जातात. गुलबदन बेगम (बाबरची लेक आणि हुमायूची बहिणी)नं हज यात्रा केली होती. राज्याच्या निधनानंतर देखील राण्यांचा दर्जा हा कमी होत नव्हता. त्यांना 'बेगम' किंवा महलच्या रुपात सन्मानित करतात आणि दरबारात त्यांचे एक विशेष स्थान असते. 

हेही वाचा : नातेवाईकाला कॅन्सरमुळे मरताना पाहिलं; अमेरिका सोडून भारतात येऊन सुरु केली कंपनी, आज Startup मधून करतोय कोटींची कमाई

बादशाह की मौत के बाद भी रानी का दर्जा और सम्मान बना रहता था. उन्हें 'बेगम' या महल के रूप में सम्मानित किया जाता था और दरबार में उनके लिए विशेष स्थान होता था. कधी जर काही परिस्थितिंमुळे वारसावरून संघर्ष होत असेल तर राण्यांना राजकारणाचा भाग बनवायचे. काही राण्या या त्यांच्याच मुलानं गाधीवर बसायला हवं यासाठी सतत प्रयत्न करत रहायच्या. अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर हा गाधीवर बसला आणि तो राज्य करू लागला. काही राण्या, जसे की नूरजहा आणि जोधाबाई या आर्थिक आणि राजकारणात सक्रिय होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात हे सगलं असाधारण होतं. तर जहांगीरच्या मृत्यूनंतर नूरजहांची सत्ता कमी झाली. शाहजहांनं तिला लाहौरला पाठवलं तिथे त्या कला आणि धर्म या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ व्यथित करू लागल्या. 

Read More