Marathi News> भारत
Advertisement

पतंजलीचा शेती उपक्रम शाश्वत शेतीसाठी वरदान, काय फायदा होतो, जाणून घ्या?

Patanjali Farming Initiatives: 'पतंजली किसान समृद्धी कार्यक्रम' सारख्या प्रकल्पांद्वारे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे योग्य प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या शेती पद्धती सुधारू शकतील आणि पीक उत्पादन वाढवू शकतील.

पतंजलीचा शेती उपक्रम शाश्वत शेतीसाठी वरदान, काय फायदा होतो, जाणून घ्या?

Patanjali Farming Initiatives: पंतजलीने भारताच्या कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणत आहेत. कंपनी सेंद्रिय शेती आणि अशा पद्धतीना प्रोत्साहन देत आहे. जे मातीचे आरोग्य सुधारू शकतात आणि शेतकऱ्यांना सक्षम करु शकतात. पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करुन पतंजली केवळ पिकांची गुणवत्ता सुधारत नाही तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे याची खात्रीदेखील करत आहे. अखेर पतंजली शेती उपक्रम शाश्वत शेतीसाठी गेमचेंजर कसे ठरत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पतंजलीचे उद्दिष्ट्य हे सेंद्रिय शेती आहे. याचच अर्थ केमिकलमुक्त पद्धती वापरून शेती करणे. यामुळं जमीन सुपिक होते. पतंजली किसान समृद्धी कार्यक्रमसारख्या प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे योग्य प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरुन ते त्यांच्या शेती पद्धती सुधारू शकतील आणि पिक उत्पादन वाढवू शकतील. जेव्हा मातीची गुणवत्ता सुधारेल तेव्हा पिकेदेखील निरोगी असतील आणि शेती दीर्घकाळ टिकेल.

शेतीसाठी पतंजलीचा नवा दृष्टिकोन

पतंजलीचा शेतीकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन भारतातील शाश्वत शेतीसाठी मोठा बदल घडवून आणत आहे. कंपनी पाणी वाचवण्यास आणि मातीचे चांगले जतन करण्यास मदत करणारे तंत्रज्ञान आणण्यासाठी संशोधन आणि नवीन कल्पनांवर लक्ष केंद्रित करत आहे. ही विचारसरणी केवळ पीक उत्पादन वाढविण्यास मदत करत नाही तर शाश्वत शेती शेतकऱ्यांसाठी एक चांगला आणि उत्पन्न देणारा स्रोत देखील बनवते. यामुळे शेतकरी त्यांचे घर, कुटुंब आणि गाव चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात.

रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर

पतंजलीच्या सेंद्रिय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा मातीचे आरोग्य आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका आहे. शेणखत आणि कंपोस्ट सेंद्रिय पदार्थ वाढवून जमिनीची सुपीकता सुधारते, तर गोमूत्र आणि कडुलिंबाचे द्रावण नैसर्गिक कीटकनाशके म्हणून काम करतात आणि जमिनीत उपयुक्त जीवाणूंना प्रोत्साहन देतात.

पतंजली ऑरगॅनिकमध्ये काय खास?

पतंजली ऑरगॅनिक प्रोम हे एक विशेष उत्पादन आहे, ज्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन 12:1 च्या प्रमाणात असते. ते केवळ मातीची रचना सुधारत नाही तर वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे देखील प्रदान करते. याशिवाय, पतंजली सेंद्रिय खत हे औषधी वनस्पती, फुले, भाज्या आणि गाईच्या शेणाच्या अवशेषांपासून बनवले जाते, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास आणि एस्परगिलस सारख्या फायदेशीर जीवाणूंचा समावेश असतो. हे खत जमिनीची भौतिक आणि रासायनिक रचना सुधारण्यास मदत करते आणि ती नापीक होण्यापासून रोखते.

(Disclaimer - This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)
Read More