Marathi News> भारत
Advertisement

'कानिफनाथ' किंवा 'नवनाथ'च का असतात रसवंतीगृहांची नावं? अनेकांना माहितही नसेल उत्तर

Sugarane Juice Ceneter Name : रसवंती गृहाची नावं नेहमी 'कानिफनाथ' किंवा 'नवनाथ'च का दिसतात.

'कानिफनाथ' किंवा 'नवनाथ'च का असतात रसवंतीगृहांची नावं? अनेकांना माहितही नसेल उत्तर

Sugarane Juice Ceneter Name : उन्हाळा आला की आपण सगळे रसवंती कुठे आहे हे शोधत असतो. इतकंच नाही तर रसवंती दिसली की आपण त्याच्या दिशेनं जातोच. त्याचं कारण म्हणजे आपल्याला या उन्हात शरिराला हायड्रेटेड ठेवायचं असतं. आता रसवंती तर पाहिली पण मग त्या रसवंतीवर असलेली नाव तुम्ही कधी वाचली आहेत का? जर तुमच्या लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणात रसवंती गृहाची नावं ही कानिफनाथ किंवा नवनाथ अशीच असतात. पण मग तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का की अशी नावं का असतात? जर तुम्हालाही हा प्रश्न असला तर त्या मागचं कारण आज आपण जाणून घेऊया... 

नवनाथ आणि कानिफनाथ ही नावं वाचवली की इतर फ्रेंचायझी स्टोअर प्रमाणे ही देखील एकाच व्यक्तीची असतील असं तुम्हाला वाटत असेल. मग यात दोन मालक असतील असं देखील अनेकांना वाटतं. मात्र, असं काही नसून त्याचं काही वेगळंच कारण आहे. नवनाथ रसवंती गृहाच्या नावामागची गोष्ट सांगतना ट्विटरवर डॉक्टर निलेश श्रीनिवास मंत्री यांनी याविषयी माहिती दिली आहे. नेमकी काय आहे आणि अशी का नावं आहेत ते जाणून घेऊया...

त्या नेटकऱ्यानं सांगितलं की नवनाथ रसवंती गृहाच्या नावाची गोष्ट जवळपास 70 ते 80 वर्षांपूर्वीची आहे. पश्चिम महाराष्ट्रात अर्थात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगाव गाव आहे. इथले शेतकरी थोड्या थोड्या पाण्यावर शेती करतात. त्याकाळी साखर कारखान्यांना पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे उसाला हक्काचं मार्केट नव्हतं. त्यामुळेच आता पैसा तर मिळायला हवा म्हणून रोजगार म्हणून रसवंती गृहाची सुरुवात करण्यात आल्याचं म्हटलं जातं.  

त्यानंतर झालं असं की एक तरुण नोकरी शोधण्यासाठी मुंबईला आला आणि त्याच्या हे लक्षात आलं की उसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पूर्वी देशी ऊस असायचे त्या उसाचं महत्त्व म्हणजे ते एका लहाणमुलाला देखील शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येत होते. त्यावेळी उसाचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते बरणीतून विकले जायचे. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की असं फिरत जाऊन उसाचे तुकडे विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी अर्थात दुकान टाकलं तर कुठेही जाण्याची गरज नाही आणि त्यामुळे उसाचा रस देखील विकता येईल. हळूहळू उसाच्या रसाची चटक आणि आरोग्यासाठी असलेला फायदा मुंबईकरांना कळला आणि अशा प्रकारे रसवंती गृहाची सुरुवात झाली. 

Read More