Marathi News> Lifestyle
Advertisement

20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले 'पालकांनी कधीही ही चूक करु नये'

तुमच्या घरात नुकताच लहान पाहुण्याच आगम झालं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. नवजात बाळाची काळजी घेताना एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यात 20 दिवसांच्या बाळाला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ आली.     

20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले 'पालकांनी कधीही ही चूक करु नये'

घरात लहान बाळ असलं की आनंदाचं वातावरण असते. पण त्यासोबत त्या चिमुकल्या बाळाचीही तेवढीच काळजीही घ्यावी लागते. बाळाचा जन्म हा पालकांसोबत घरातील अनेक सदस्यांच्या आनंदात भर टाकतो. त्या बाळाला प्रेम करण्यासाठी बघण्यासाठी अनेक लोक येत असतात. पण तुम्हाला माहितीय का हे नुकतच जन्माला आलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते. त्या बाळाला लगेचच संसर्ग होण्याचा धोका असतो. नुकतच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात फक्त 20 दिवसांच्या चिमुकलीला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ आली. या निष्पाप बाळाची प्रकृती अचानक खराब झाली. त्यामुळे उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली. 

डॉक्टर पवन मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या घटनेबद्दल सांगितलं आहे. त्यासोबत प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची सुचना केली आहे. कारण या निष्पाप बाळाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ तिच्या पालकांच्या चुकीमुळे आली आहे. 

डॉ. पवन मांडवीय सांगितलं की, अलिकडेच एका पालकाने त्यांच्या 20 दिवसांच्या नवजात बाळाला आपत्कालीन कक्षात आणले. बाळाची तपासणी केली असता त्याला सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया झाल्याचं निष्पण झालं. बाळाची प्रकृती अशी होती की त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. कुटुंबाशी बोलले असता असे आढळून आले की, आपल्या भारतीय समाजात ज्याप्रमाणे बाळाच्या जन्मानंतर नातेवाईक आणि मित्र त्याला पाहिला येतात. त्याचप्रमाणे त्या नवजात बाळाला भेटण्यासाठी अनेक लोक एकत्र आले होते.

डॉ. पवन मांडवीय म्हणतात की, अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा घरात एखादा छोटा पाहुणा येतो तेव्हा नातेवाईक आणि मित्र त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. या काळात बरेच लोक मुलाला आपल्या मांडीवर घेतात, काहीजण त्याला खायला घालतात आणि अनेक वेळा प्रेमाने गालावर चुंबनही घेतात.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीत जर त्यापैकी कोणालाही सर्दी, खोकला, फ्लू किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला तर ते मुलासाठी खूप धोकादायक ठरू शकते. डॉ. पवन स्पष्ट करतात की अशा संसर्गांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्ती मोठ्या मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये आधीच विकसित झालेली असते, पण नवजात किंवा लहान मुलांमध्ये ती पूर्णपणे विकसित झालेली नसते.

आता अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग झाला असेल आणि तो मुलाच्या जवळ आला किंवा त्याचे चुंबन घेतले तर हा संसर्ग मुलापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मुलामध्ये सर्दी, खोकला किंवा अगदी न्यूमोनिया देखील होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात, 'मला समजते की आपल्या भारतीय समाजात, जर एखाद्या नातेवाईकाला मुलापासून दूर राहण्यास किंवा त्याचे चुंबन घेऊ नये असे सांगितले तर त्याला वाईट वाटू शकते. पण आपण हे विसरू नये की आपल्या मुलाची सुरक्षितता ही आपली पहिली प्राथमिकता असली पाहिजे.'

जर एखाद्याला सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्ग झाला असेल तर त्याने मुलापासून कमीत कमी 6 फूट अंतर राखले पाहिजे. जवळ जाणे आवश्यक असेल तर मास्क घालून जावे. पालकांनी कोणालाही मुलाला किस करू देऊ नये, कारण यामुळे मुलाला विषाणूजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. डॉक्टर पवन म्हणतात की जर घरात एखादा छोटा पाहुणा आला असेल आणि लोक त्याला भेटायला येत असतील तर काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम, जर कोणी मुलाला स्पर्श करणार असेल किंवा खायला घालणार असेल तर त्याने त्याचे हात योग्यरित्या स्वच्छ केले आहेत याची खात्री करा .

Read More