Interesting Facts About Water Bottle : पाणी हे जीवनासाठी आवश्यक तत्त्व आहे. धरतीवर प्रत्येक सजीवास म्हणजे मनुष्य, झाडे आणि जनावर या सगळ्यांना पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. पाणी फक्त पिण्यासाठीच आवश्यक नाही तर सगळ्याच प्रकारच्या कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते.
सामान्यपणे शुद्धपाणी कधीच खराब होत नाही. पण मग पाण्याच्या बाटलीवर का असते एक्सपायरी डेट. यावरुन असा प्रश्न निर्माण होतो की, पाणी खराब होते का? याबद्दल जाणून घेऊया Interesting Facts?
बाटलीबंद पाण्यावर एक्सपायरी डेट पाण्यासाठी लिहिलेली नसते, तर बाटलीबंद असते. बाटलीबंद पाणी सहसा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक करून विकले जाते. अशा परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये वापरलेली काही रसायने कालांतराने पाण्यात विरघळू शकतात. ज्यामुळे पाण्याची चव बदलू शकते. त्याचा वास येऊ शकतो आणि पाण्याची शुद्धता देखील कमी होऊ शकते. म्हणूनच बाटलीबंद पाण्यावर एक्सपायरी डेट लिहिली जाते.
कालावधी संपल्यानंतर सीलबंद पाणी पिणे सुरक्षित मानले जात नाही, कारण त्यात प्लास्टिकचे हानिकारक रसायने असू शकतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून, जेव्हाही तुम्ही बाहेरून पिण्यासाठी पाण्याची बाटली खरेदी करता तेव्हा त्याची कालबाह्यता तारीख नक्की तपासा. माहितीसाठी, पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे, परंतु पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी 96% पेक्षा जास्त पाणी खारट आहे. फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. त्याच वेळी, सामान्यतः शुद्ध पाणी स्वतःच खराब होत नाही, परंतु पाण्यात असलेले अशुद्धता, जसे की बॅक्टेरिया किंवा इतर प्रदूषक कालांतराने ते खराब करू शकतात. यासोबतच, जर पाणी योग्यरित्या साठवले नाही तर ते खराब होऊ शकते.