Marathi News> Lifestyle
Advertisement

जया किशोरी म्हणतात- या चुका करून भारतीय पालक करतात मुलींचं नुकसान

Parenting Tips :  मोटिवेशन स्पिकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कोणते पालक आपल्या मुलांचे नुकसान करतात. एवढंच नव्हे ते मुलांचं भविष्यही धोक्यात आणतात. 

जया किशोरी म्हणतात- या चुका करून भारतीय पालक करतात मुलींचं नुकसान

मुलांच्या संगोपनात त्यांच्या पालकांचा खूप मोठा वाटा असतो. पालकांना प्रत्येक क्षणाला अतिशय विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. पालकांकडून छोटी चूक देखील झाली तरी ती मुलांना महागात पडू शकते. अशावेळी मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी यांनी सांगितल्या पॅरेंटिंग टिप्स. जया किशोरी त्यांच्या एका भाषणात सांगत आहेत की, पालक मुलांसमोर वाईटपणे भांडतात आणि एकमेकांना खूप वाईट वागतात. त्याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. जेव्हा मुली त्यांच्या वडिलांना  आईचा छळ करताना पाहतात तेव्हा त्यांना वाटते की हे सामान्य आहे. आणि ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. 

व्हिडीओ पाहा 

मुलींना वाटते सामान्य बाब

मुली लग्नापासून खूप पळत असतात. याला कारण आहे दोघांचे होणारे वाद. वादामुळे पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात. अशावेळी मुलांना तडजोड करण्याचा अनुभव पालकांकडून मिळत नाही. पटलं नाही तर, वाद झाला नाही तर एकमेकांपासून वेगळे होणे हा एकच उत्तम पर्याय असल्याचा मुलींचा समज होतो. 

स्ट्रेसमध्ये हार्मोन्स बदलतात 

बीबीसीमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, यूके आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाद्वारे घरी केलेल्या अभ्यासानुसार, 6 महिन्यांच्या बाळांसमोर भांडण करणारे पालक बाळाच्या हृदयाची गती वाढवू शकतात आणि त्यांच्या तणाव संप्रेरक प्रतिसाद देखील वाढवू शकतात.

असुरक्षिततेची भावना 

मुलांना घर हे कायम सुरक्षित ठिकाण वाटते. जर मुलांच्या समोर घरी वाद केला तर मुलांना घर हे असुरक्षित ठिकाण वाटतं. मुलांमध्ये चिंता, असहाय्य आणि भितीची भावना असते. मुले सहसा असे समजतात की, ते त्यांच्या पालकांच्या भांडणाचे कारण आहेत आणि शेवटी त्यांना अपराधी वाटते. हे त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या वेदनादायक असू शकते.

आत्मविश्वास होतो कमी 

असुरक्षितता आणि अपराधीपणाची आणि लज्जाची भावना तुमच्या मुलाला अवांछित आणि अयोग्य वाटू शकते. यामुळे त्याच्या आत्मसन्मानात घट होते जी त्याच्या दीर्घकालीन वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांसाठी कायमस्वरूपी आणि हानिकारक असू शकते.

अभ्यासावर होतो परिणाम 

आपल्या आई-वडिलांना भांडताना पाहणाऱ्या मुलाचे मन नेहमी भांडणे आणि वादात व्यस्त असते. यामुळे त्याला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. ज्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर विपरित परिणाम होतो. UCLA ने आयोजित केलेल्या जवळपास 50 शोधनिबंधांच्या पुनरावलोकनातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जोखीम असलेल्या घरांमध्ये वाढणारी मुले प्रौढ जीवनात शारीरिक आरोग्याच्या समस्यांची तक्रार करतात, जसे की रक्तवहिन्यासंबंधी विकार, रोगप्रतिकारक विकार इ.

Read More