Marathi News> Lifestyle
Advertisement

तुमचं मुल बारावीत नापास झालं? न ओरडता असा वाढवा त्यांचा आत्मविश्वास?

HSC Result : नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. या निकालात काहींना यश मिळालं तर काहींना अपयश. जर तुमचं मुलं या बारावीच्या परीक्षेत नापास झालं असेल तर त्याला न रागवता त्याला समजून घ्या आणि आत्मविश्वास वाढवा.

तुमचं मुल बारावीत नापास झालं? न ओरडता असा वाढवा त्यांचा आत्मविश्वास?

How to Encourange Child : आजकाल मुलांच मुल्यांकन त्यांचं यश हे परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरुन ठरवलं जातं. खास करुन शेजारी किंवा नातेवाईक मुलाला त्याचे दहावी-बारावीचे मार्क्स विचारतात तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो. पण परीक्षेत मिळणारे गुण हे फक्त आकडे आहेत. यावरुन त्यांचं करिअर ठरतं भविष्य नाही. अशावेळी पालकांची जबाबदारी मोठी राहते की, त्यांनी मुलांचा जर निकाल नापास असा लागला तर त्यावर नाराज न होता त्यांना समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. 

तुमचं मुलं देखील या बारावीच्या परीक्षेत नापास झालं असेल तर त्याला मारुन किंवा टोमणे मारुन काहीच फायदा नाही. अशावेळी पालकांनी मुलांना निराश होऊ न देता त्यांचा आत्मविश्वास वाढवणं तेवढंच गरजेचं आहे. अशावेळी पालकांनी खाली दिलेल्या बाबींचा विचार करावा. 

मुलाशी मोकळेपणाने बोला

लाज वाटल्यामुळे, मुले त्यांच्या पालकांशी या विषयावर बोलण्यास कचरतात. अशा परिस्थितीत, पालकांनी त्यांना अधिक लाजिरवाणे वाटेल असं वागण्याऐवजी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची लागेल ती मदत करायला हवी. मुलांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी देऊन पुढे जाण्यास सांगा.

या काळात मुलांना आधार द्या

मुलांची, विशेषतः किशोरवयीन मुलांची समस्या अशी आहे की, ते त्यांच्या कठीण काळात मदत मागत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला पुढे जाऊन त्यांना सांगावे लागेल की, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नेहमीच तयार आहात. हाच काळ आहे जेव्हा त्यांचे पालक त्यांना मित्र म्हणून जवळ हवेत. त्यांना त्यांच्या आताच्या परिस्थितीसकट त्यांना स्विकारा. 

नैराश्यापासून बचाव करा

प्रत्येक मुलाला त्याच्या पालकांना आनंदी करायचे असते. अशा परिस्थितीत, जेव्हा ते परीक्षेत नापास होतात तेव्हा त्यांना अपराधीपणाची भावना येते ज्यामुळे ते नैराश्याकडे वाटचाल करू लागतात. अशा परिस्थितीत, त्यांच्यावर अतिरेक ताण देण्याऐवजी किंवा त्यांना शिक्षा करण्याऐवजी, तुमचे मूल नैराश्यात जात आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. यामुळे मुलाचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. मुलांशी संवाद साधा. 

जास्त अपेक्षा ठेवू नका

तुमच्या मुलांकडून भविष्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवू नका. असे केल्याने मुलांवर दबाव येतो आणि त्यांची कामगिरी आणखी वाईट होते. अशा परिस्थितीत, जर मूल अपयशी ठरले असेल, तर एकत्र बसून एक नवीन ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यात त्याला मदत करा. यासाठी तुम्ही एक योजना बनवावी आणि त्याची इतरांशी तुलना करू नये. करिअर निवडताना कोणताही ताण येणार नाही याची काळजी घ्या. 

Read More