Marathi News> विधानसभा २०१४
Advertisement

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित-विराटने मैदानात केलं असं सेलिब्रेशन; पाहा VIDEO

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मैदानात स्टंपसह दांडिया खेळत आनंद व्यक्त केला. तर जडेजा आणि अर्शदीप सिंग यांनी भांगडा करताना दिसून आलेत.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित-विराटने मैदानात केलं असं सेलिब्रेशन; पाहा VIDEO

Champions Trophy 2025: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने 4 विकेट्सनी विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या शानदार विजयानंतर, एक असा क्षण आला जो पाहण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक होते. टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर आनंद साजरा करण्यासाठी मैदानात पोहोचले.

दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये रोहित-कोहली मैदानाच्या मध्यभागी स्टंपसह दांडिया खेळत आहेत. 

 

 

रोहित आणि कोहलीने दांडिया खेळला

 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीला बॅटने चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याआधी सेमीफायनल आणि ग्रुप स्टेजमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माची बॅट बोलली आणि हिटमॅनने 76 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. विजयानंतर टीम इंडियाने जल्लोष केला. रोहित आणि कोहली मैदानावर पोहोचले आणि स्टंपसह दांडिया खेळायला सुरुवात केली, तर जडेजा आणि अर्शदीप सिंग देखील भांगडा करताना दिसले.

 

रोमांचक सामन्यात भारतानकडून न्यूझीलंडचा पराभव 

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज नाचताना दिसले. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने 6 चेंडू शिल्लक असताना साध्य करून इतिहास रचला. भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी भारताने 2002 आणि 2013 मध्ये हे विजेतेपद जिंकले होते.

Read More