Report Card Of Mahayuti: राज्यातील महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन कोणत्या विभागाला आणि मंत्रालयाला किती गुण मिळाले याची यादीच पोस्ट केली आहे. राज्यातील 1000 दिवसांचे रिपोर्ट कार्ड कसं आहे? जाणून घेऊया.
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक… pic.twitter.com/8IfRVry1jb
आदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास विभागाला 80 गुण मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक मिळाला असून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृषी विभागाला तिस-या क्रमांक तर चौथ्या क्रमांकावर ग्रामविकास विभाग आहे.
- महिला व बाल विकास -80%
- सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95%
- कृषी विभाग 66.15%
- ग्राम विकास विभाग 63.85%
- परिवहन व बंदरे विभाग 61.28%
- महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर- 86.29
- महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड-85.71
- महानगरपालिका आयुक्त, पनवेल- 79.43
- महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई- 79.43
- पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर- 84.57
- पोलीस आयुक्त, ठाणे-76.57
- सर्वोत्तम पोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे-73.14
- विभागीय आयुक्त, कोकण-75.43
- विभागीय आयुक्त,नाशिक-62.29
- विभागीय आयुक्त, नागपूर-62.29
- पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, कोकण- 78.86
- पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, नांदेड-61.14