Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू! कसा आणि कुठे करायचा ऑनलाइन अर्ज? जाणून घ्या राज्यभरातील एकूण जागा

Education News: अकरावी प्रवेशासाठी २८ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू! कसा आणि कुठे करायचा ऑनलाइन अर्ज? जाणून घ्या राज्यभरातील एकूण जागा

11th Admission Process: राज्यभरातील अकरावीच्या प्रवेशासाठी २१ मेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे ही शेवटची तारीख आहे. यानंतर ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी आणि ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यावर्षीपासून संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने (Maharashtra FYJC Admission 2025) पार पडणार आहे.

राज्यभरातील अकरावीच्या एकूण जागा किती? 

  • एकूण प्रवेश क्षमत्ता: २०,९१,३९०
  • कला शाखा: ६,७२,७५४
  • वाणिज्य शाखा: ५,४८,३१६
  • विज्ञान शाखा: ८,७०,३२८


अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज कसा आणि कुठे भरायचा?

  • सगळ्यात आधी https://mahafyjcadmissions.in/landing या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दोन टप्प्यात अर्ज भरायचा आहे.
  • भाग १: पहिल्या भागात तुम्हाला तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरायची आहे. 
  • भाग २: दुसऱ्या भागात तुम्हाला हवे असलेले कॉलेज भरायचे आहेत. तुमच्या पसंती नुसार क्रम लावायचा आहे. (तुम्ही जास्तीत जास्त  १० पर्याय निवडू शकता)
  • अर्ज फी: अकरावी प्रवेशाची अर्जाची फी फक्त १०० रुपये आहे. 
  • प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थी आपल्याला पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला नसेल तर पुढील फेरीसाठी पसंतीक्रम पुन्हा भरावा लागेल. 

अर्ज भरण्यात अडचण आल्यास... 

अर्ज भरण्यात अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 8530955564 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.

आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश बंद

पूर्वी काही खासगी कनिष्ठ कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देत शुल्क आकारले जात होते. परंतु यावर्षीपासून ही पद्धत थांबवण्यात आली असून सर्व प्रवेश ऑनलाइन आणि क्षमतेनुसारच होतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठी अडचण...

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी मोठी अडचण आली आहे. ऑफिशियल संकेतस्थळावर क्लिक केले असता साईट अंडर मेंटेनन्स असा मेसेज येत आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना बसतोय फटका बसत आहे. सोमवार पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आज बुधवार सकाळ पासून अनेक विद्यार्थ्यांना ही समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. 

Read More