Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

जेवणाची भ्रांत असल्याने मातृत्वही नकोसे! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात हजारो महिलांनी काढली गर्भाशयाची पिशवी

खळबळ! पोटाच्या खळगीसाठी गर्भपिशवी काढली; उसतोड कामगार महिलांची वानवा, सरकारी डॉक्टरांनी...

 जेवणाची भ्रांत असल्याने मातृत्वही नकोसे! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात हजारो महिलांनी काढली गर्भाशयाची पिशवी

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दरवर्षी 1 लाख 75 हजार मजून ऊसतोडीच्या कामाला जातात. 78 हजार महिला मजूर कामगार आहेत. महिलांबाबत एक धक्कादाय माहिती समोर आली आहे. ती म्हणजे 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली आहे. यामध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर 1523 गर्भवती महिला उसाच्या फडात काम असल्याच म्हटल जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठकही घेण्यात आली आहे. त्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे. 

ऊसतोडीला जाण्यापूर्वी जिल्ह्यातील 843 महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली. त्यातही 30 ते 35 वयोगटातील 477 महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे. अंगावरून जाणे, मासिक पाळीत रक्तस्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशी लक्षणे या महिलांना असल्याचे सांगण्यात आले.पोटात बाळ आणि पोटासाठी हाती कोयता, असा संघर्ष ऊसतोड महिलांचा सुरु आहे. या सर्व महिलांची नोंद माता व बाल संगोपन पोर्टलवर झाली आहे. लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता, थलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्राव झाल्यास रक्तक्षय होतो. असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या 3415 एवढी आहे.

Read More